एकनाथ शिंदेंनी डबल गेम केला, उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ आणू नका, मनोज जरांगे संतापले..
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. हेच नाही तर कोण कट रचत असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदेंनी विश्वास घात केल्याचाही दावा त्यांनी केला.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. मराठा समाजासाठी आंदोलन सुरू झाल्यापासूनच एकनाथ शिंदे यांच्यावर एकदाही टीका करताना मनोज जरांगे पाटील दिसले नाहीत. मात्र, आता पहिल्यांदाच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे डबल गेम करत असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला. भुमरेंसाठी मराठा समाजाच्या पोरांनी जीवाचे रान केले. आमच्या उपकारांची परतफेड करता का? भुमरे मामा तुम्ही सहा नंबरला होते… तुम्ही इतक्या लवकर विसरलात का? सध्या तात्पुरते घ्या आणि नंतर रद्द करा असं बावनकुळे यांनी सांगितलं होतंय. देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत, याचा अर्थ मुकसमंती आहे. संजय सिरसाठ यांनी का केलं असावं… हा कट एकनाथ शिंदे यांनीच केला, असाही गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांना बरा म्हणायची वेळ आली आहे. तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला. मीडियात जाहीर पणे सांगितलं होतो. जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी आमच्या लेकराचं वाटोळं करत आहात का? यादरम्यानच मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे साहेब मी तुमचे सर्व लोकं झोपून टाकीन… पाडून टाकीन, असा गंभीर इशाराच दिला.
पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नव्हती. किती दिवस डबल ढोलकी वाजवणार… मी मिंधा नाही, जेलमध्ये सुद्धा जायला घाबरणार नाही.. बावनकुळे फडणवीस यांचा मालक झाला का? म्हणत मनोज जरांगे पाटील संतापले. यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, शिंदे त्यांच्या नेत्यांचा कॉलेजमध्ये बैठका घेत आहेत.
पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावर इतकी गंभीर टीका करताना मनोज जरांगे पाटील दिसले. मी खूपच जास्त खुनशी आहे, एकदा जर डोक्यात गेला तर सोडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांना वारंवार इशारा देताना मनोज जरांगे पाटील दिसले. मंत्रालयात बसून कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला.
