AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul: ‘राहुलकडे आयडीयाज नाहीत असं वाटलं’, कॅप्टन म्हणून गावस्करांनी दाखवून दिली मोठी चूक

"ज्यावेळी चांगली भागिदारी होत असते, तेव्हा काहीवेळेला कर्णधाराला काही सुचत नाही. मला वाटतं मैदानावर राहुल बरोबर तसं घडलं. फलंदाजीसाठी ही चांगली विकेट होती. चेंडू बॅटवर आरामात येत होता" असे गावस्कर म्हणाले.

KL Rahul: 'राहुलकडे आयडीयाज नाहीत असं वाटलं', कॅप्टन म्हणून गावस्करांनी दाखवून दिली मोठी चूक
सुनिल गावस्कर
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 5:27 PM
Share

मुंबई: भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी पुन्हा एकदा केएल राहुलच्या नेतृत्वावर टीका केली आहे. टेंबा बावुमा (Temba Bavuma) आणि रॅसी डुसे जेव्हा मॅचविनिंग भागीदारी करत होते, तेव्हा कॅप्टन केएल राहुलकडे (KL Rahul) त्यांना रोखण्यासाठी कुठल्या नवीन कल्पना दिसल्या नाहीत, असं गावस्कर यांनी म्हटलय. केएल राहुलसाठी सुरुवातीचे दिवस आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघ सरस खेळ दाखवेल, अशी अपेक्षा गावस्कर यांनी व्यक्त केली.

गोलंदाजीतील बदलावर प्रश्नचिन्ह

भारतीय संघाने गोलंदाजीत जे बदल केले, त्यावर सुनील गावस्करांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारकडून डाव्याच्या अखेरीस जास्त गोलंदाजी करुन घ्यायला पाहिजे होती. मधल्या षटकांमध्ये बावुमा-डुसेची भागीदारी तोडण्यासाठी वेंकटेश अय्यरला गोलंदाजीची संधी दिली पाहिजे होती” असे गावस्कर म्हणाले. “ज्यावेळी चांगली भागिदारी होत असते, तेव्हा काहीवेळेला कर्णधाराला काही सुचत नाही. मला वाटतं मैदानावर राहुल बरोबर तसं घडलं. फलंदाजीसाठी ही चांगली विकेट होती. चेंडू बॅटवर आरामात येत होता” असे गावस्कर म्हणाले.

मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखता आले असते

“बावुमा-डुसेची भागीदारी होत असताना, राहुलकडे आयडीयाज नाहीत असं वाटलं. कुठे जायचं हे राहुलला कळत नव्हतं. तुमच्याकडे शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बुमराह आणि भुवनेश्वर सारखे अनुभवी गोलंदाज आहेत. शेवटच्या पाच-सहा षटकांसाठी त्यांना राखून ठेवायला पाहिजे होते. त्यामुळे तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखता आले असते” असे गावस्कर म्हणाले. “राहुलच्या कॅप्टनशिपचे हे सुरुवातीचे दिवस आहेत. भारतीय क्रिकेटसाठी पुढच्या काही दिवसात गोष्टी बदलतील अशी अपेक्षा करुया” असे गावस्कर म्हणाले.

काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे मध्ये भारताचा 31 धावांनी पराभव झाला. बावुमा आणि डुसेच्या शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य ठेवले पण भारताने निर्धारीत 50 षटकात 265 धावा केल्या. नियमित कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमधून अजून सावरलेला नाही. त्यामुळे राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. जोहान्सबर्ग कसोटीतही राहुलने नेतृत्व केलं होतं, तेव्हा सुद्धा भारताचा पराभव झाला होता.

South Africa vs India Captain KL Rahul looked like he had run out of ideas in 1st ODI says Sunil Gavaskar

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.