AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 World Cup: फायनल संघ निवडण्यासाठी Rahul Dravid यांच्याकडे फक्त चार चान्स, ICC कडून अंतिम यादी सोपवण्याची तारीख जाहीर

आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup) अंतिम संघ निवडण्याची मुदत जाहीर झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्व क्रिकेट बोर्डांना 15 सप्टेंबरपर्यंत 15 सदस्यीय संघाची यादी सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.

T 20 World Cup: फायनल संघ निवडण्यासाठी Rahul Dravid यांच्याकडे फक्त चार चान्स, ICC कडून अंतिम यादी सोपवण्याची तारीख जाहीर
राहुल द्रवीड, प्रशिक्षक, भारतीय क्रिकेट संघImage Credit source: TV9
| Updated on: Jun 20, 2022 | 2:47 PM
Share

मुंबई: आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup) अंतिम संघ निवडण्याची मुदत जाहीर झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्व क्रिकेट बोर्डांना 15 सप्टेंबरपर्यंत 15 सदस्यीय संघाची यादी सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. आता हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडे टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ निवड करण्याकरता फक्त चार संधी उरल्या आहेत. यंदा ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. आता हेड कोच राहुल द्रविड यांच्याकडे अंतिम संघ निश्चित करण्यासाठी फक्त काही सामने उरले आहेत. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून जिव्हारी लागणारा पराभव झाला होता. आता त्या सर्व कटू आठवणी पुसून नव्याने झेप घेण्याची टीम इंडियाकडे संधी आहे.

पहिली संधी –

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयर्लंडमध्ये दोन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

दुसरी संधी –

जुलै महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयपीएल 2022 नंतर भारतीय संघ या मालिकेत पूर्ण ताकदीने खेळताना दिसणार आहे.

तिसरी संधी –

इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर तोच संघ वेस्ट इंडिजला जाऊ शकतो. तिथे वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

चौथी संधी –

27 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धा होणार आहे. सामन्याच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत.

कसं आहे वेळापत्रक

26 जून आणि 28 जून असे आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामने खेळणार आहे.

7 जुलै ते 10 जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची सीरीज होईल.

29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी 20 सामन्याची मालिका होईल.

27 ऑगस्टपासून टी 20 आशिया कप स्पर्धा सुरु होणार आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.