AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंका- ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे WTC 2027 गुणतालिकेत अशी झाली उलथापालथ, भारताला बसला फटका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने कसोटी विजय मिळवताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फरक पडला आहे. मात्र भारताचं मोठं नुकसान झालं आहे.

श्रीलंका- ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे WTC 2027 गुणतालिकेत अशी झाली उलथापालथ, भारताला बसला फटका
श्रीलंका- ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे WTC 2027 गुणतालिकेत अशी झाली उलथापालथ, भारताला बसला फटका
| Updated on: Jun 28, 2025 | 2:45 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आता नऊ संघांमध्ये चुरस सुरु झाली आहे. प्रत्येक कसोटी सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश हे संघ कसोटी सामने खेळले आहेत. त्या सहा संघांमध्या कसोटीच्या चार सामन्यानंतर उलथपालथ झाली आहे. पहिला कसोटी सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात पार पडला. हा सामना ड्रा झाला होता. तर इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभूत केल. त्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला, तर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 100 टक्के विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहेत. तर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून तिसरं स्थान पटकावलं आहे. तर बांग्लादेश चौथ्या स्थानी असून वेस्ट इंडिज आणि भारताची पिछेहाट झाली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकला असून 12 गुणांसह विजयी टक्केवारी ही 100 टक्के आहे. तर श्रीलंकेने एक सामना जिंकला आणि एक ड्रॉ झाला. त्यामुळे 16 गुणांसह 66.67 विजयी टक्केवारी आहे. बांगलादेशने एक सामना गमावला आणि एक ड्रॉ झाला म्हणून 4 गुणांसह विजयी टक्केवारी 16.67 टक्के आहे. तर वेस्ट इंडिज आणि भारताने पहिला कसोटी सामना गमावल्याने गुण आणि विजयी टक्केवारी ही शून्य आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना आता पुढच्या सामन्यात कमबॅक करावं लागणार आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला तर गुणतालिकेत तिसरं स्थान गाठू शकतो. भारत आणि इंग्लंडची विजयी टक्केवारी 50 टक्के असेल. दोन्ही संघांची गुणही 12 असतील. दुसरीकडे, वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत केलं. तर त्यांचीही विजयी टक्केवारी 50 आणि गुण 12 असतील. दरम्यान असं काही घडलं तर श्रीलंकेला फायदा होईल. श्रीलंका 66.67 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानी पोहोचेल. पण यासाठी भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना पुढचे सामने जिंकावे लागतील.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!