AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Agarkar: हार्दिकला वगळून सूर्याच कॅप्टन का? निवड समिती अध्यक्ष म्हणाले….

Ajit Agarkar On T20i Captaincy: सूर्यकुमार यादवला बीसीसीआयने टीम इंडियाची टी20i कॅप्टन्सी दिली. हार्दिक पंड्याला डच्चू दिल्याने त्याच्यावर अन्याय झाल्याचा सूर क्रिकेट चाहत्यांचा आहे.

Ajit Agarkar: हार्दिकला वगळून सूर्याच कॅप्टन का? निवड समिती अध्यक्ष म्हणाले....
Surya Hardik and agarkar
| Updated on: Jul 22, 2024 | 11:13 AM
Share

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला 27 जुलैपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. मुंबईकर सूर्यकुमार यादव याला रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टी20i कॅप्टन करण्यात आलं. टीम इंडियाचा हार्दिक पंड्या हा देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत होता, तसेच तो प्रबळ दावेदारही होता. मात्र 2021 मध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादव याला कॅप्टन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच बीसीसीआयने सूर्यकुमारला कॅप्टन करुन हार्दिकवर अन्याय केल्याचं नेटकरी म्हणत होते. अनुभवी हार्दिकला वगळून सूर्यालाच कॅप्टन का केलं? या अनेकांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी उत्तर दिलंय.

अजित आगरकर काय म्हणाले?

“सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्यात आलं, कारण तो पात्र उमेदवारांपैकी एक आहे. तो सर्वोत्तम T20I बॅट्समन आहे. आम्हाला असा कॅप्टन हवा आहे, जो सर्व सामने खेळू शकेल. हार्दिक पंड्या याचा फिटनेस हा त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे”, असं आगरकर यांनी म्हटलं. आगरकर यांनी सूर्याला कॅप्टन करण्याचं स्पष्टीकरण देऊन या विषयाला पूर्णविराम लावला. गौतम गंभीर यांची हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आगरकर यांनी या पत्रकार परिषदेत हे उत्तर दिलं.

हार्दिकसाठी त्याचा फिटनेस डोकेदुखी ठरली आहे. हार्दिकला गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने दुखापत झाली आहे. हार्दिकला त्यामुळे दुखापतीवर मेहनत घ्यावी लागते. परिणामी टीम इंडियाला जेव्हा पंड्याची जेव्हा अधिक गरज असते, तेव्हाच तो उपलब्ध नसतो. हार्दिकला वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली. त्यानंतर तो अनेक महिने टीम इंडियापासून दूर होता. त्यामुळे कॅप्टन्सीबाबत हार्दिकला त्याच्या फिटनेस दगा दिला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हार्दिक म्हणून कॅप्टन नाही

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा

दरम्यान टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिका 3-3 सामन्यांच्या असणार आहेत. सूर्यकुमार टी20i सीरिजमध्ये नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा याच्याकडेच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे.

Follow Us
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?