AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील जेतेपदानंतर टीम इंडियावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबईत याची प्रचिती गुरुवारी दिसून आली आहे. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक पार पडली. यावेळी लाखोंचा जनसमुदाय हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी लोटला होता. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टीम इंडियातील मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव
| Updated on: Jul 05, 2024 | 4:18 PM
Share

टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी चषकावर नाव कोरलं. तसेच 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप भारताने जिंकला आहे. विजयानंतर टीम इंडिया भारतात पोहोचली तेव्हा त्यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईच्या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी विश्व विजेत्या टीम इंडियातील 4 खेळाडूंनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. या सत्कारानंतर हे 4 खेळाडू विधानभवनात जाणार आहेत. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार होणार आहे. त्यासाठी विधानभवनात लोककलाकार जमले आहेत. विधानभवनात मुंबईकर खेळाडूंचं तुतारी वाजवून स्वागत केलं जाणार आहे. तसेच राज्य सरकारने 4 मुंबईकर खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.

रोहित शर्माने संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत आक्रमक शैलीने विरोधी संघांना घाम फोडला होता. तर सूर्यकुमार यादवला खेळपट्टीवर पाहून गोलंदाजांची भंबेरी उडत होती. तसेच सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकात पकडलेला झेल कायमचा स्मरणात राहणारा आहे. कारण हा झेल पकडताना एक चूक झाली असती तर सामना गमवण्याची वेळ आली असती. शिवम दुबेनेही मधल्या फळीत टीम इंडियाला मोलाची साथ दिली. यशस्वी जयस्वालला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. पण त्याचं संघात असणंही खूप महत्त्वाचं होतं. एखादा खेळाडू जखमी झाला असता तर त्याची जागा भरून काढता आली असती.

टी20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 7 धावांनी धुव्वा उडवला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत धाकधूक वाढवणारा ठरला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर डेविड मिलरने मारलेला उत्तुंग फटका पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. सिक्स जाऊ नये अशीच सर्वांची भावना होती. पण सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला आणि सामना भारताच्या पारड्यात पडला. सहा महिन्यांआधी टीम इंडियाला वनडे वर्ल्डकप जिंकण्याची संधी चालून आली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने विजयरथ अडवला आणि स्वप्न भंगलं होतं. मात्र आता ही कसर टी20 वर्ल्डकप जिंकून काढण्यात आली आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.