AUS vs IND | चौथ्या कसोटीवर धोक्याचं सावट, ब्रिस्बेनमध्ये खेळण्यास टीम इंडियाचा नकार?

ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येणार आहे. हा सामना 15 जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे.

AUS vs IND | चौथ्या कसोटीवर धोक्याचं सावट, ब्रिस्बेनमध्ये खेळण्यास टीम इंडियाचा नकार?
टीम इंडिया
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 11:32 AM

ब्रिस्बेन : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. चौथा कसोटी सामना वेळापत्रकानुसार ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येणार आहे. दरम्यान याआधी चौथ्या कसोटी सामन्यावर धोक्याचं सावट आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार टीम इंडियाने सांगितलं की, “ब्रिस्बेनमध्ये गेल्यास आम्हाला आमच्यावर बंधन घातली तसेच आम्हाला रुममध्येच रहायला सांगितलं तर आम्ही एकाच शहरात उर्वरित 2 कसोटी सामने खेळण्यास तयार आहोत.” तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून सिडनीत खेळण्यात येणार आहे. तर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 15 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. (Team India are not ready to travel to Brisbane for the fourth Test due to corona rules)

टीम इंडिया सध्या मेलबर्नमध्ये आहे. तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया 4 जानेवारीला सिडनीला रवाना होणार आहे. गेल्या काही दिवसात मेलबर्नमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात सापडले होते. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांना इथेच थांबवण्यात आलं. तिसरा सामना सिडनीत खेळण्यात येणार की नाही, याबाबत अनिश्चिचतता होती. मात्र तिसरी कसोटी सिडनीमध्येच होणार अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दिली.

ब्रिस्बेनमध्ये खेळाडूंवर बंधन

सिडनीत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळले. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक सरकारने राज्याच्या सीमा बंद केल्या. मात्र दोन्ही क्रिकेट संघांना आणि ब्रॉडकास्टिंग सदस्यांना काही अटीशर्थींसह विमानाने इथे येण्याची परवानगी स्थानिक सरकारने दिली. अटीनुसार या खेळाडूंना सामन्या आणि सरावाव्यतिरिक्त आपल्या रुममध्येच रहावे लागणार आहे.

टीम इंडिया क्वारंटाईन राहण्यास तयार नाही

या अटी शर्थींमुळे टीम इंडियास ब्रिस्बेनला जाण्यास तयार नाही, असे वृत्त क्रिकबझने दिलं आहे. या वृत्तानुसार, आम्ही ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर नियमांनुसार 14 दिवस क्वारंटाईन राहू. यानंतर आम्हाला इतर नागरिकांसारखं फिरण्याचं स्वातंत्र्य मिळावे, अशी भूमिका टीम इंडियाने स्पष्ट केली होती.

“सिडनीत येण्यापूर्वी आम्ही 14 दिवस दुबईमध्ये क्वारंटाईन होतो. त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियात आल्यावर 14 दिवस क्वारंटाईन राहिलो. म्हणजेच टीम इंडिया महिनाभर क्वारंटाईन राहिली. त्यामुळे टीम इंडियाची पुन्हा क्वारंटाईन राहण्याची इच्छा नाही” , अशी माहिती टीम इंडियाच्या एका सूत्राने क्रिकबझला दिली.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी वेळोवेळी स्थानिक सरकारच्या नियमांचं पालन केलं आहे. मात्र आता आम्हाला पुन्हा क्वारंटाईन राहायचं नाही. यासाठी आम्ही एकाच मैदानात दोन्ही सामने खेळण्यास तयार आहोत. अशी भूमिका टीम इंडियाची आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

AUS vs IND Test Series | हिटमॅन रोहित शर्मासह टीम इंडियाचे अन्य 4 खेळाडू आयसोलेट

(Team India are not ready to travel to Brisbane for the fourth Test due to corona rules)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.