AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Captain : ‘रोहित आयुष्यात सगळं विसरेल पण ही एक गोष्ट कधीच विसरणार नाही ; टीम इंडियाच्या माजी बॅटींग कोचचे मोठे विधान

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच लाखो फॅन आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच विजेतेपद आता टी-20 वर्ल्ड कप जिंकत रोहितने इतिहास रचला. हिटमॅनची विसरण्याची एक सवय आहे, ती अनेकांना माहित आहे. याचाच धागा पकडत टीम इंडियाच्या माजी कोचने मोठं विधान केलं आहे.

Captain : 'रोहित आयुष्यात सगळं विसरेल पण ही एक गोष्ट कधीच विसरणार नाही ; टीम इंडियाच्या माजी बॅटींग कोचचे मोठे विधान
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 19, 2024 | 8:03 PM
Share

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा किती विसरभोळा आहे सर्वांना माहितच आहे. टॉसला जिंकल्यावर तो आपला निर्णय देताना गडबडून जातो. अनेकदा तो हॉटेलमध्ये त्यात्या मौल्यवान वस्तू विसरल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. रोहित बोलतानाही त्याच्या स्टाईलमध्ये बोलतो. काही गोष्टी सांगताना तो ज्याचं संदर्भ देतो तेव्हा फक्त, ‘ते नाही का, आपलं हे’ असं बोलतो. विराटनेही रोहितच्या या सवयीबाबत सांगितलं होतं. मात्र रोहित शर्मा याची एक अशी गोष्ट आहे जो ती कधीच विसरत नाही, असं टीमच्या माजी कोचने सांगितलं आहे.

मी आतापर्यंत कोणत्याही कॅप्टनला टीम मीटिंग आणि स्ट्रॅटेजीच्या चर्चांमध्ये रस घेताना पाहिलं नाही. मान्य आहे रोहित टॉसवेळी गोलंदाजी की फलंदाजी निर्णय घ्यायचा हे विसरेल, बसमध्ये रोहित त्याचा फोन आयपॅड विसरतो. पण, तो कधीच गेम प्लॅन विसरू शकत नाही. चालू सामन्यामध्ये परिस्थिनुसार तो चतुराईने रणनिती आखत असल्याचं टीम इंजिडयाचे माजी बॅटींग कोच विक्रम राठोड यांनी सांगितलं. तरूवर कोहलीच्या पॉकास्टमध्ये राठोड बोलत होते.

सामन्याआधी गेम प्लॅन करण्यासाठी जास्त वेळ लावतो. टीममधील बॉलर आणि बॅट्समनच्याही मीटिंगला हजर राहतो. सर्वांसोबत बसून काय केलं पाहिजे यासाठी सर्वांसोबत चर्चा करतो. प्रत्येक खेळाडूसोबत त्याची चांगली मैत्री असते. तो टीममधील खेळाडूंसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो. रोहितकडे तीन गुण आहेत, पहिला एक चांगला खेळाडू, तो त्याच्या खेळाला चांगलं समजतो आणि त्याकडे नेहमी गेमप्लॅन तयार असतो, असं विक्रम राठोड म्हणाले.

तुम्हाला खेळाडूंचा एक नेता म्हणून नेतृत्व करावं लागतं. पण त्यासाठी तुम्हाला तशी दर्जेदार कामगिरी करता यायला हवी. रोहित जेव्हापासून कॅप्टन झालाय तेव्हापासून त्याने नेहमीच आपल्या खेळीने सर्वांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे. रोहित हा सर्व खेळाडूंशी जोडला गेल्याचं राठोय यांनी सांगितलं.

विक्रम राठोड हे टीम इंडियाचा बॅटींग कोच होते. टी -20 वर्ल्ड कप 2024 साली टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर राहुल द्रविड याच्यासह विक्रम राठोड यांचाही कोचपदाचा कार्यकाल संपला.  रोहितच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने 13 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला.

Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...