AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Retirement : भारताला तुझी…, रायुडू विराटबाबत निवृत्तीच्या चर्चेवरुन काय म्हणाला?

Ambati Rayudu On Virat Kohli : क्रिकेट विश्वात सध्या विराट कोहली याच्या कसोटीतील कथित निवृत्तीची चर्चा पाहायला मिळतेय. यावरुन टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अंबाती रायुडूने याने एक पोस्ट केली आहे.

Virat Kohli Retirement : भारताला तुझी..., रायुडू विराटबाबत निवृत्तीच्या चर्चेवरुन काय म्हणाला?
Ambati Rayudu and Virat KohliImage Credit source: tv9telugu
| Updated on: May 11, 2025 | 4:56 PM
Share

रोहित शर्मा याच्यानंतर आता विराट कोहली कसोटी क्रिकेटला अलविदा करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. विराट इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर बीसीसीआय विराटची मनधरणी करतेय, असाही दावा केला जात आहे. अशात टीम इंडियाचा माजी विकेटकीपर बॅट्समन अंबाती रायुडू याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करत विराटच्या निवृत्तीच्या चर्चेवरुन आपलं मत मांडलं आहे. रायुडूने विराटला विनंती केली आहे. तु निवृत्त होऊ नकोस, तुझी टीमला आधीपेक्षा अधिक गरज आहे, असं रायुडूने म्हटलंय.

रायुडू काय म्हणाला?

रायुडूने विराटला त्याच्या कथित कसोटी निवृ्त्तीच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे. “विराटशिवाय टीम इंडिया आधीसारखी राहणार नाही. “विराट कोहली, कृपया निवृत्त होऊ नको. भारताला तुझी आधीपेक्षा जास्त गरज आहे. तुझ्याकडे अजून खूप काही आहे. तुझ्याशिवाट कसोटी क्रिकेट आधीसारखं राहणार नाही. कृपया पुनर्विचार करावा”, अशी विनंती रायुडूने विराटला या पोस्टद्वारे केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, विराटने इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्त होणार अलल्याचं बीसीसीआयला सांगितलं आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. उभयसंघात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच या मालिकेने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीची सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने याआधी सलग 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक दिली. मात्र भारताला दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तसेच मायदेशात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका गमावल्याने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्याची संधी हुकली.

अंबाती रायुडूची एक्स पोस्ट

विराटला 10 हजार धावा करण्याची संधी

दरम्यान विराट कोहली याला कसोटीत 10 हजार धावा करण्याच्या उंबरठ्यावर आहे. विराटने 2011 साली कसोटी पदार्पण केलं आहे. विराटने तेव्हापासून एकूण 123 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने या सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9 हजार 230 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटने कथित निवृत्तीच्या निर्णयाबाबत फेरविचार केला तर तो 10 हजार धावांच्या आणखी जवळ पोहचू शकतो.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?