AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bcci : रोहित-विराट बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणामुळे कसोटीतून निवृत्त.., दिग्गजाचा खळबळजनक दावा

Rohit Sharma and Virat Kohli Retirement : विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही काही दिवसांच्या अंतराने एकाएकी आणि अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे या दोघांवर निवृत्ती घेण्यासाठी दबाव होता का? अशी चर्चा तेव्हापासून होती. आता यावरुन भारताच्या माजी खेळाडूंना मोठा दावा केला आहे.

Bcci : रोहित-विराट बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणामुळे कसोटीतून निवृत्त.., दिग्गजाचा खळबळजनक दावा
Virat and Rohit Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Aug 16, 2025 | 8:40 PM
Share

टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहितनंतर विराटनेही तडकाफडकी सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना झटका दिला. रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित करण्यात आले. रोहित आणि विराटच्या निवृत्तीवरुन भारताचे माजी खेळाडू करसन घावरी यांनी खळबळजनक दावा केला आहे. रोहित-विराटने स्वइच्छेने नाही, तर बीसीसीआय आणि निवड समितीच्या अंतर्गत राजकारणामुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्याचा दावा घावरी यांनी केला आहे.

घावरी काय म्हणाले?

घावरी यांच्यानुसार, विराट कोहली आणखी किमान 2 वर्ष कसोटी क्रिकेट खळू शकला असता. तसेच घावरी यांनी बीसीसीआयने भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिकेटरला निरोप न देण्याच्या मुद्द्यावरुनही भाष्य केलं.

“हे एक रहस्य आहे. विराटने निश्चितच भारतासाठी पुढील काही वर्षांपर्यंत खेळणं सुरु ठेवायला हवं होतं. मात्र काही गोष्टींमुळे त्याला निवृत्ती घेण्यास भाग पाडल्याचं मला वाटतं. विराटने निवृत्ती घेतली तेव्हा बीसीसीआयने त्याला निरोपही दिला नाही”, असंही घावरी यांनी नमूद केलं. घावरी विक्की लालवानी शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये घावरी यांना विराटच्या तडकाफडकी कसोटी निवृत्तीबाबत प्रश्न करण्यात आला. यावर घावरी यांनी प्रतिक्रिया दिली.

“विराट आणि रोहित अंतर्गत राजकारणाचे शिकार”

विराट आणि रोहित हे दोघेही भारतीय टीम मॅनेजमेंटच्या अंतर्गत राजकारणाचे शिकार झाल्याचं घावरी यांनी म्हटलं. “हे बीसीसीआयचं अतंर्गत राजकारण आहे, जे समजणं फार अवघड आहे. त्यामुळे त्याने वेळेआधी निवृत्ती घेण्यामागे हे कारण असू शकतं, असं मला वाटतं”, असं घावरी यांनी सांगितलं.

“तसेच रोहितनेही वेळेआधी निवृत्ती घेतली. रोहितला बाहेर होण्यास सांगण्यात आलं होतं. रोहितला संघातून बाहेर होण्याची इच्छा नव्हती. मात्र निवड समिती आणि बीसीसीआयचे विचार वेगळे होते”, असंही घावरी यांनी म्हटलं.

दरम्यान रोहित आणि विराट या दोघांनी कसोटीआधी 2024 वर्ल्ड कपनंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला होता. त्यामुळे ही जोडी आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. हे दोघे आता मायदेशात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक्शन मोडमध्ये दिसू शकतात. मात्र त्याआधी या दोघांच्या वनडे क्रिकेटमधील निवृत्तीबाबतही चर्चा रंगली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...