AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1,2..5, टीम इंडियाची ऐतिहासिक कामिगरी, 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कारनामा

Indian Cricket Team : टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीत सलग 2 शतकं झळकावली. शुबमनसेनेने यासह भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अविस्मरणीय कामगिरी केली.

1,2..5, टीम इंडियाची ऐतिहासिक कामिगरी, 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कारनामा
Rishahb Pant and KL RahulImage Credit source: PTI And Bcci X Account
| Updated on: Jun 23, 2025 | 10:19 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिल याच्या नेतृत्वात पहिल्याच कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि उपकर्णधार शुबमन गिल या तिघांनी केलेल्या शतक खेळीच्या जोरावर 471 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला आघाडी मोडीत काढण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 465 धावांवर आऊट केलं. भारताने अशाप्रकारे 6 धावांची आघाडी मिळवली. टीम इंडियाकडून ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. तर प्रसिध कृष्णा याने इंग्लंडच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

ऋषभ पंत एकमेव भारतीय विकेटकीपर

त्यानंतर भारताने दुसऱ्या डावातही कमाल केली. टीम इंडियाच्या 2 फलंदाजांनी सामन्यातील चौथ्या दिवशी शतकी खेळी केली. केएल राहुल याने कसोटी कारकीर्दीतील नववं तर इंग्लंडमधील तिसरं शतक झळकावलं. तसेच उपकर्णधार ऋषभ पंत याने इतिहास घडवला. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून दोन्ही डावात शतक करणारा पहिला तर एकूण दुसरा विकेटकीपर ठरला.

टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी

ऋषभ पंत याने 130 बॉलमध्ये 12 फोर आणि 2 सिक्ससह 1 कसोटी कारकीर्दीतील आठवं शतक पूर्ण केलं. पंतच्या या शतकासह भारतीय कसोटी क्रिकेटच्या 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं. भारताकडून एकाच कसोटी सामन्यात 5 फलंदाजांची शतक करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. भारतीय कसोटी संघाला याआधी कधीही एकाच सामन्यात 5 शतकं करता आली नव्हती.

टीम इंडियाकडून 18 वर्षांपूर्वीचा स्वत:चा रेकॉर्ड ब्रेक

भारतीय संघाने यासह 2007 साली केलेला स्वत:चा विक्रम मोडीत काढला. भारताने 2007 साली एकाच सामन्यात 4 शतकं केली होती. भारताने तेव्हा माीरपूरमध्ये बांगलादेश विरुद्ध ही कामगिरी केली होती.

टीम इंडियाचे पंचरत्न

दरम्यान टीम इंडियाने दुसऱ्या डावात 90.2 ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजच्या रुपात आठवी विकेट गमावली. भारताने 349 धावा केल्या आहेत. तसेच भारताने यासह 355 धावांची आघाडी मिळवली आहे. तसेच ऋषभ याने 118 धावा केल्या. तर केएल राहुल याने 137 धावांची खेळी केली. आता टीम इंडिया इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान ठेवते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.