
बांगलादेशचा स्पर्धेवर बहिष्कार त्यानंतर पाकिस्तानचं टीम इंडिया विरुद्ध न खेळण्याचा निर्णय यामुळे आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वाआधीच वादाला सुरुवात झाली. मात्र आयसीसीने हेकडी दाखवणार्या बांगलादेशला त्यांची जागा दाखवून दिली. आयसीसीने बहिष्काराची भाषा करणाऱ्या बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली. त्यानंतर काही बैठकींनंतर टीम इंडिया विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्ताननेही विरोधाची तलवार म्यान केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना महामुकाबला पाहायला मिळाला. टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. टीम इंडियाच्या चाहत्यांना अखेर या स्पर्धेचा शेवट जसा अपेक्षित होता तसाच झाला. टीम इंडियाने या 10 व्या पर्वात 9 पैकी 8 सामने जिंकत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तसेच सर्वाधिक तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत टी 20I वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 पर्वाची यशस्वी सांगता झाली. त्यानिमित्ताने या स्पर्धेत झालेल्या काही खास रेकॉर्ड्सहबाबत आपण जाणून घेऊयात. ...