AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant : ऋषभ पंत याच्या तब्येतीबाबत ‘मोठी अपडेट

ऋषभ पंत 30 डिसेंबर रस्ते अपघातात जखमी झाला. त्यानंतर पंतवर देहरादूनमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बीसीसीआयने पंतवर मुंबईत उपचार करण्याचं ठरवलं.

Rishabh Pant : ऋषभ पंत याच्या तब्येतीबाबत 'मोठी अपडेट
| Updated on: Jan 14, 2023 | 5:50 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्या कारला काही दिवसांपूर्वी अपघात झाला. पंतला प्रथमोपचारांनंतर आवश्यक उपचारांसाठी मुंबईत शिफ्ट करण्यात आले. आता पंतच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पंतची तब्येत कशी आहे, याकडे चाहत्यांचं आणि एकूणच क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून होतं. आता पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. पंतच्या गाडीचा डिसेंबर 2022 मध्ये अपघात झाला होता. या अपघातानंतर पंतवर लिगामेंट सर्जरी करण्यात आली.

ऋषभ पंत शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदा खाटेवरुन उठून पायावर काही मिनिटांसाठी खाटेवरुन उठून उभा राहिला. पंतवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनुसार, त्याला मैदानात परतण्यासाठी किमान 4-6 महिने लागू शकतात. मात्र हे सर्व फिजीओ आणि संबंधित व्यक्तीवरही अवलंबून असतं.

पंत 30 डिसेंबर रस्ते अपघातात जखमी झाला. त्यानंतर पंतवर देहरादूनमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बीसीसीआयने पंतवर मुंबईत उपचार करण्याचं ठरवलं. त्यानुसार पंतला मुंबईत 4 जानेवारीला एअरलिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर डॉ दिनशॉ पारदीवाला यांच्या निगराणीखाली कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं.

काही दिवसांनी पंतच्या गुडघ्यावर लिगामेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया 3 तास चालली. सूत्रांच्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेच्या 4-5 दिवसांनंतर मंगळवारी पंतला इतरांच्या मदतीने खाटेवरुन उठवण्यात आलं. तसेच काही सेकंदांसाठी तो उभा राहिला. पंत येत्या काही दिवसांमध्ये वाकरच्या मदतीने चालण्याचा सल्ला देण्यात येईल. तसेच आणखी एक आठवडा पंत रुग्णालयात राहिल. तसेच त्याला कठीण रिहॅबची गरज पडेल, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

“लिगामेंट शस्त्रक्रियेनंतर त्यातून पूर्णपणे बरं होण्यासाठी 4-6 आठवडे लागतात. यानंतरच्या 2 ते 3 महिन्यांनंतर पंत पायाने सराव करु शकतो. मात्र पंतला पूर्णपणे फीट होण्यासाठी आणखी 4 महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पंतला एकूण किमान 6 महिने लागू शकतात. मात्र पंतवर कशाप्रकारे लक्ष ठेवलं जातंय आणि त्याला कशाप्रकारे इतर सुविधा मिळतायेत हे देखील तितकंच महत्वाचं आहे. या पेक्षा मला लवकर बरं व्हायचंय ही व्यक्तीची इच्छाशक्तीही त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी निर्णायक ठरते.”, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.

दरम्यान टीम इंडियाने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही जिंकली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा रविवारी 15 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत भिडणार आहे. बीसीसीआयने या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची शुक्रवारी 13 जानेवारीला रात्री घोषणा करण्यात आली.

Follow Us
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...