AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit-Virat : रोहित शर्मा-विराट कोहलीला आयसीसीकडून मोठा झटका, नक्की काय?

Rohit Sharma and Virat Kohli in ICC Odi Rankings : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना आयसीसीने मोठा झटका दिलाय. आयसीसीने या दोन्ही आजी माजी कर्णधारांना एकदिवसीय क्रमवारीतून डच्चू दिला आहे.

Rohit-Virat : रोहित शर्मा-विराट कोहलीला आयसीसीकडून मोठा झटका, नक्की काय?
Rohit Sharma and Virat Kohli Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Aug 20, 2025 | 4:44 PM
Share

आगामी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर आता अवघ्या काही तासांनी आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाची अनुभवी जोडी या रँकिंगमधून बाहेर नाही तर थेट गायबच झाली आहे. या जोडीची एकाच आठवड्यात सारखीच स्थिती झाली आहे. आयसीसीच्या गेल्या आठवड्यातील बॅटिंग रँकिंगमध्ये रोहित आणि विराट टॉप 5 मध्ये होते. मात्र ताज्या आकडेवारीत या दोघांना बाहेर करण्यात आलं आहे.

रोहित-विराट रँकिंगमधून गायब

रोहित आणि विराट हे दोघेही वनडे रँकिंगमध्ये चांगल्या स्थितीत होते. दोघेही पहिल्या पाचात असल्याने क्रिकेट चाहतेही आनंदी होते. तेव्हा रोहित 756 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी होता. तर विराट चौथ्या क्रमांकावर होता. विराटच्या खात्यात तेव्हा 736 रेटिंग होते. विराट चौथ्या क्रमांकावर होता. मात्र आता हे दोघेही रँकिंगमध्येच नाहीत.

रोहित-विराटचा कशामुळे पत्ता कट?

रोहित आणि विराट या दोघांचा अचानक आयसीसी वनडे रँकिंगमधून अचानक पत्ता कट का आणि कशामुळे झाला? या मागे आयसीसीचा कोणता नियम आहे की हे चुकीमुळे झालंय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच या निमित्ताने आपण आयसीसीचा नियम जाणून घेऊयात.

आयसीसीच्या रँकिंग नियमानुसार, खेळाडू निवृत्त झाला असेल किंवा तो 9-12 महिने एकही एकदिवसीय सामना खेळला नसेल तर त्याचा क्रमवारीतील पहिल्या 100 खेळाडूंमध्ये समावेश केला जात नाही. मात्र विराट आणि रोहितला हे दोन्ही निकष लागू होत नाही. विराट आणि रोहित हे दोघे मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळले होचे. दोघांनी शेवटचा सामना हा 5 महिन्यांआधी खेळला होता. तसेच दोघे फक्त टी 20i आणि कसोटीमधून निवृत्त झाले आहेत. मात्र त्यानंतरही असं का झालं? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

हिंदूस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, रोहित आणि विराटसोबत असं होण्यामागे नियम वगैरे काही नाही. तर हे तांत्रिक कारणामुळे झालं असावं. त्यामुळे आयसीसीकडून पुन्हा एकदा सुधारित क्रमवारी जाहीर करण्यात येऊ शकते.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.