AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : रोहित-विराटला आशिया कप स्पर्धेत खेळता येणार नाही, त्या एका निर्णयामुळे फटका

Virat Kohli and Rohit Sharma : रोहित-विराट या दोघांचं बांगलादेश विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून मैदानात कमबॅक होणार होतं. मात्र बांगलादेश दौरा स्थगित करण्यात आला. त्यानंतर या अनुभवी जोडीला आशिया कप स्पर्धेतही खेळता येणार नाही. जाणून घ्या कारण.

Asia Cup 2025 : रोहित-विराटला आशिया कप स्पर्धेत खेळता येणार नाही, त्या एका निर्णयामुळे फटका
Rohit Sharma and Virat KohliImage Credit source: PTI
| Updated on: Jul 28, 2025 | 6:27 PM
Share

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघ इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4 सामन्यानंतर 1-2 ने पिछाडीवर आहे. तर उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार होती. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने भारताची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं क्रिकेटच्या मैदानात कमबॅक होणार, हे निश्चित होतं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र हा दौरा स्थगित करण्यात आला. त्यामुळे भारतीच चाहत्यांना या जोडीला पाहण्यासाठी आणखी काही महिने प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता रोहित-विराट चाहत्यांना आणखी एक मोठा झटका लागला आहे. विराट आणि रोहितला आगामी आशिया कप 2025 स्पर्धेतही खेळता येणार नाहीय. रोहित-विराटला या स्पर्धेत खेळता न येण्यामागचं कारण जाणून घेऊयात.

26 जुलैला वेळापत्रक जाहीर

अनेक बैठका आणि चर्चांनंतर एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेने शनिवारी 26 जुलैला आशिया बहुप्रतिक्षित कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एसीसीने दिलेल्या माहितीनुसार 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान एकूण 8 संघात स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध सामने खेळणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवलं आहे. त्यामुळे या कट्ट्रर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार असल्याचं निश्चित झालं आहे. ए ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे. तर हाँगकाँग, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे 4 संघ बी ग्रुपमध्ये आहेत.

आशिया कप 2023 स्पर्धा वनडे फॉर्मेटनुसार खेळवण्यात आली होती. त्या स्पर्धेत भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तर यंदा आगामी 2026 टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. विराट आणि रोहित या दोघांनीही 2024 च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयानंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच टी 20 फॉर्मेटने या स्पर्धेत सामने होणार असल्याने विराट-रोहितला या स्पर्धेत खेळता येणार नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.