VIDEO : 24 तासांत टीम इंडियानं घेतला बदला, वेस्ट इंडिजच्या पराभवाची 3 कारणं जाणून घ्या….

दुसरा T20I सामना 5 गडी राखून गमावल्यानंतर भारतानं तिसरा T20I 24 तासांनी 7 विकेट्सनं जिंकला. यासह टीम इंडियानं 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत पुन्हा एकदा 2-1 अशी आघाडी घेतली आहे. अधिक जाणून घ्या...

VIDEO : 24 तासांत टीम इंडियानं घेतला बदला, वेस्ट इंडिजच्या पराभवाची 3 कारणं जाणून घ्या....
Ind vs WI 3rd T20IImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 6:49 AM

नवी दिल्ली : Ind vs WI 3rd T20I सामन्यात मंगळवारी दिवसाची सुरुवात टीम इंडिया संघाच्या (Team India)  पराभवाच्या बातमीनं सुरू झाली. मात्र, बुधवारची सकाळ वेस्ट इंडिजच्या (Ind vs WI) पराभवाची आणि टीम इंडियाच्या विजयाची बातमी घेऊन आली आणि पुन्हा एकदा टीम इंडियाचं कौतुक होऊ लागलं, चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर (Social Media) पोस्टचा वर्षाव सुरू केला. टीम इंडियानं 24 तासांत वेस्ट इंडिजविरुद्ध बदला घेतला. परिस्थिती तशीच होती. टीम इंडियासमोर वेस्ट इंडिजच्या टीमनं गुडघे टेकवले असा हा सामना झाला. यासह पाचव्या टी-20 सामन्याच्या सीरिजमध्ये टी इंडियानं पुन्हा एकदा 2-1ची आगेकुच केली आहे. भारतानं दुसरा टी 20I हा पाच विकेटनं पराभूत झाल्याच्या 24 घंट्यानंतर तीसरा T-20I सामना सात विकेटनं जिकला. पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघानं विजय खेचून आणला आहे.

तिसऱ्या T20I मध्ये भारतानं नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी दिली. प्रथम खेळताना वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं हे लक्ष्य एक षटक शिल्लक असताना म्हणजे 19व्या षटकातच 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. आता विजयाची ती 3 कारणे पाहूया जी भारतीय संघाचे 3 चेहरे आहेत.

सूर्यकुमार यादव

रोहित शर्माच्या निवृत्त दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवनं भारताला विजय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये तो यशस्वी ठरला. त्यानं संघाला ती गती दिली, त्यामुळे उर्वरित फलंदाजांचे काम सोपे झाले. सूर्यकुमार यादवनं 44 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 76 धावा केल्या.

हा व्हिडीओ पाहा

ऋषभ पंत

सूर्यकुमार यादवनं चांगली सुरुवात केली, तर ऋषभ पंतनं नाबाद खेळीनं शेवटपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. पंतनं 26 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 33 धावा केल्या.

हा व्हिडीओ पाहा

भुवनेश्वर कुमार

भारताच्या विजयात भुवीची भूमिकाही नाकारता येणार नाही. त्यानं 4 षटकात 35 धावा देत 2 बळी घेतले. यातील एक विकेट धोकादायक काईल मायर्सची होती. ज्याने 73 धावा केल्या. दुसरी विकेट कॅरेबियन कर्णधार निकोलस पूरनची होती, जर तो विकेटवर थांबला असता तर तो मोठा धोका बनू शकतो. पण भुवीने लवकरच त्याचे पाय उपटले. आणि भारताला विजयासाठी एकूण 170 पेक्षा कमी धावा होत्या.

सोशल मीडियावर पोस्टचा वर्षाव

टीम इंडियाच्या विजयानं सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी पोस्टचा वर्षाव केल्याचं दिसून आलं. भारताच्या विजयाच्या या पोस्ट होत्या. 24 तासांत भारतानं वेस्ट इंडिजचा पराभव घेतला आणि पुन्हा एकदा यशोशिखरावर जाऊन बसल्याचं बोललं जातं होतं.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.