AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | भारत-पाकिस्तान परत एकदा एकमेकांना भिडणार, सामन्याची तारीख समोर

IND vs PAK Match : आता परत एकदा टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. हा सामना कुठे आणि कधी होणार याबाबत जाणून घ्या.

IND vs PAK | भारत-पाकिस्तान परत एकदा एकमेकांना भिडणार, सामन्याची तारीख समोर
india-vs-pakistan
| Updated on: Jan 04, 2024 | 11:36 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि पाकिस्तानमधील सामना क्रिकेट जगतातील सर्वांसाठी एक पर्वणीच असते. वन डे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. हाय व्होल्टेज सामना होईल असं सर्वांना वाटलं होतं. अमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने सहज पाकिस्तान संघाचा पराभव केला होता. आता परत एकदा टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. हा सामना कुठे आणि कधी होणार याबाबत जाणून घ्या.

टीम इंडिया वि. पाकिस्तान कधी आणि केव्हा होणार?

आयपीएल झाल्यावर यंदा टी-20 वर्ल्ड कप आहे. आगामी वर्ल्ड कपचं यजमानपद हे वेस्ट इंडिज आणि अमिरेकाकडे असणार आहे. टीम इंडियाचा वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभव झाला होता. आयसीसी ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडे मोठी संधी असणार आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत.

टीम इंडिया आणि पाकिस्तान 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये भिडणार आहेत. वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा हा दुसरा सामना असणार आहे. पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. अमेरिका संघासोबतही टीम इंडियाचा सामना 12 जूनला होणार आहे. अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ असणार असून त्यामधील 12 संघ मुख्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत. सुपर 8 फेरी होणार असून त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल सामना असणार आहे.

दरम्यान, 2022 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता.  विराट कोहली याची शानदार खेळी अजुनही सर्वांच्या लक्षात आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.