AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं की…

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. याबाबत अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं की...
| Updated on: Sep 09, 2024 | 9:23 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून आहे. आयसीसी स्पर्धेचं आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्वोतोपरी तयारी केली आहे. स्पर्धेचं प्रारूप वेळापत्रकापासून नियोजनापर्यंत खलबतं सुरु आहेत. फक्त भारतीय संघ पाकिस्तानात येणार की नाही यावर घोडं अडून बसलं आहे. बीसीसीआयने भारतीय पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. भारत सरकाराने परवानगी दिली तरच टीम इंडिया पाकिस्तानात येईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. असं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेलं विधान महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या विधानाचा सरळ अर्थ भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही असाच निघत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध केला. तसेच भारत पाकिस्तान संबंधांबाबत स्पष्टपणे सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, ‘जोपर्यंत तिथला दहशतवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तान सरकारशी कोणतीही चर्चा करणार नाहीत. त्याआधी आम्हाला जम्मू काश्मीरमधील तरूणांच मत जाणून घ्यायचं आहे आणि त्यांच्याशी बोलायचं आहे.’ अमित शाह यांचं हे विधान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलाही लागू होत आहे. त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट होत आहे. अमित शाह यांच्या वक्तव्यापूर्वीच बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रिड स्वरुपात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची विनंती केली आहे. मात्र आयसीसीकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय आलेला नाही.

दरम्यान, बीसीसीआय सचिव जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाली आहे. 1 डिसेंबरपासून ते कार्यभार सांभाळणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आशिया कप स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली गेली होती. तेव्हा भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. तसेच अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करत चषकावर नाव कोरलं होतं.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.