AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं की…

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. याबाबत अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं की...
| Updated on: Sep 09, 2024 | 9:23 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून आहे. आयसीसी स्पर्धेचं आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्वोतोपरी तयारी केली आहे. स्पर्धेचं प्रारूप वेळापत्रकापासून नियोजनापर्यंत खलबतं सुरु आहेत. फक्त भारतीय संघ पाकिस्तानात येणार की नाही यावर घोडं अडून बसलं आहे. बीसीसीआयने भारतीय पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. भारत सरकाराने परवानगी दिली तरच टीम इंडिया पाकिस्तानात येईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. असं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेलं विधान महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या विधानाचा सरळ अर्थ भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही असाच निघत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध केला. तसेच भारत पाकिस्तान संबंधांबाबत स्पष्टपणे सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, ‘जोपर्यंत तिथला दहशतवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तान सरकारशी कोणतीही चर्चा करणार नाहीत. त्याआधी आम्हाला जम्मू काश्मीरमधील तरूणांच मत जाणून घ्यायचं आहे आणि त्यांच्याशी बोलायचं आहे.’ अमित शाह यांचं हे विधान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलाही लागू होत आहे. त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट होत आहे. अमित शाह यांच्या वक्तव्यापूर्वीच बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रिड स्वरुपात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची विनंती केली आहे. मात्र आयसीसीकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय आलेला नाही.

दरम्यान, बीसीसीआय सचिव जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाली आहे. 1 डिसेंबरपासून ते कार्यभार सांभाळणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आशिया कप स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली गेली होती. तेव्हा भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. तसेच अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करत चषकावर नाव कोरलं होतं.

Follow Us
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!