AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात परतणार टीम इंडिया, पाहा किती वाजता दाखल होणार

भारतीय संघ भारतात दाखल होणार आहे. भारतात आल्यानंतर भारतीय संघाचं जोरदार स्वागत होणार आहे. भारतीय संघ पहाटे बार्बाडोस येथून भारतात येण्यासाठी निघाले आहे. विशेष विमानाने भारतीय संघाला परत आणलं जात आहे. चक्रीवादळामुळे भारतीय संघ तेथे अडकला होता. आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात परतणार टीम इंडिया, पाहा किती वाजता दाखल होणार
| Updated on: Jul 03, 2024 | 6:24 PM
Share

टीम इंडिया लवकरच घरी पोहोचणार आहे. रोहित शर्माच्या टीमसाठी ‘एअर इंडिया चॅम्पियन्स 24 वर्ल्ड कप’ नावाच्या एअर इंडिया बोईंग 777 विशेष चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्यात आलीये. भारतीय खेळाडू गुरुवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. त्यानंतर ते मुंबईत दाखल होतील. बेरील चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसांपासून भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला होता. आता भारतीय संघ, संघाचे सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे कुटुंबीय, BCCI अधिकारी आणि भारतीय मीडिया व्यक्तींना परत आणण्यासाठी विशेष विमान पाठवणण्यात आले आहे.

भारतात परतणार संघ

टीम इंडिया विश्वविजेता झाल्यानंतर आता भारतात परतत आहे. कर्णधार रोहित शर्मासह संघातील खेळाडूंनी त्यांच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने शनिवारी दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकलाय.

घरी परत येत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. भारतात परतण्यासाठी उशीर झाल्याने संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे 6 जुलैपासून झिम्बाब्वे विरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी हरारेला वेळेत पोहोचू शकणार नाहीत.

निवृत्तीची घोषणा

टीम इंडिया ११ वर्षानंतर विश्वविजेता झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी T20 आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये. यासोबतच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कोच म्हणून कार्यकाळ देखील संपला आहे.

विशेष चार्टर्ड फ्लाइटने स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:30 वाजता ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले आहे. हे विमान दिल्लीत पोहोचण्याची वेळ सकाळी 6 वाजता आहे. नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर भारतीय संघ सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे.

Follow Us
इराण आणि इस्रायल युद्धावरून संसद तापली, लोकसभेत गदारोळ
इराण आणि इस्रायल युद्धावरून संसद तापली, लोकसभेत गदारोळ.
पुणे विमानतळावर 8 कोटींचे ड्रग्ज जप्त! एअर इंटेलिजन्सची मोठी कारवाई
पुणे विमानतळावर 8 कोटींचे ड्रग्ज जप्त! एअर इंटेलिजन्सची मोठी कारवाई.
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.