AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात परतणार टीम इंडिया, पाहा किती वाजता दाखल होणार

भारतीय संघ भारतात दाखल होणार आहे. भारतात आल्यानंतर भारतीय संघाचं जोरदार स्वागत होणार आहे. भारतीय संघ पहाटे बार्बाडोस येथून भारतात येण्यासाठी निघाले आहे. विशेष विमानाने भारतीय संघाला परत आणलं जात आहे. चक्रीवादळामुळे भारतीय संघ तेथे अडकला होता. आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात परतणार टीम इंडिया, पाहा किती वाजता दाखल होणार
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 03, 2024 | 6:24 PM
Share

टीम इंडिया लवकरच घरी पोहोचणार आहे. रोहित शर्माच्या टीमसाठी ‘एअर इंडिया चॅम्पियन्स 24 वर्ल्ड कप’ नावाच्या एअर इंडिया बोईंग 777 विशेष चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्यात आलीये. भारतीय खेळाडू गुरुवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. त्यानंतर ते मुंबईत दाखल होतील. बेरील चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसांपासून भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला होता. आता भारतीय संघ, संघाचे सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे कुटुंबीय, BCCI अधिकारी आणि भारतीय मीडिया व्यक्तींना परत आणण्यासाठी विशेष विमान पाठवणण्यात आले आहे.

भारतात परतणार संघ

टीम इंडिया विश्वविजेता झाल्यानंतर आता भारतात परतत आहे. कर्णधार रोहित शर्मासह संघातील खेळाडूंनी त्यांच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने शनिवारी दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकलाय.

घरी परत येत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. भारतात परतण्यासाठी उशीर झाल्याने संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे 6 जुलैपासून झिम्बाब्वे विरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी हरारेला वेळेत पोहोचू शकणार नाहीत.

निवृत्तीची घोषणा

टीम इंडिया ११ वर्षानंतर विश्वविजेता झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी T20 आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये. यासोबतच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कोच म्हणून कार्यकाळ देखील संपला आहे.

विशेष चार्टर्ड फ्लाइटने स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:30 वाजता ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले आहे. हे विमान दिल्लीत पोहोचण्याची वेळ सकाळी 6 वाजता आहे. नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर भारतीय संघ सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!