AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Final: आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरूत नाही तर….! का बदललं ठिकाण? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम सामना आता बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार नाही. यापूर्वी बंगळुरूत होणार असं सांगितलं जात होतं. पण स्पर्धेच्या मध्यात ठिकाण बदलल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पण असं का झालं? ते जाणून घेऊयात..

IPL 2026 Final: आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरूत नाही तर....! का बदललं ठिकाण? जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरू नाही तर....! का बदललं ठिकाण? जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 06, 2026 | 9:32 PM
Share

Bengaluru, Chinnaswamy Stadium: आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफची चुरस वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ टॉप 4 मध्ये असून शर्यतीत आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार होता. गतविजेत्या आरसीबी संघाचं होमग्राउंड असल्याने या ठिकाणी आयोजन केल्याचं बोललं जात होतं. पण आता या सामन्याचं ठिकाण बदलणअयात आलं आहे. आता आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. हा सामना आधी बंगळुरूत होणार होता, तर मग बीसीसीआयने स्पर्धेच्या मध्यात ठिकाण का बदललं? अखेर सामन्याचं ठिकाण बदलण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात..

अंतिम सामन्याचं ठिकाण का बदललं?

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीचं ठिकाण बदलण्याचं कारण म्हणजे तेथे रंगलेलं आमदार प्रकरण… यापूर्वीच हा वाद निस्तरला गेला नाही तर बीसीसीआय वेगळ्या ठिकाणी अंतिम फेरीचं आयोजन करेल अशी चर्चा होती. झालंही तसंच.. आमदार प्रकरण काही सुटताना दिसत नसल्याने बीसीसीआयने अंतिम सामन्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धेच्या ओपनिंग सामन्यापूर्वी काँग्रेसचे आमदार विजयानंद कशप्पनवर यांनी एक प्रस्ताव ठेवला होता. प्रत्येक आमदाराला किमान पाच तिकीटं मिळायला हवीत. आमदार हा लोकप्रतिनिधी असतो आणि त्याला रांगेत उभं राहून वाट पाहावी लागू नये. काँग्रेस आमदाराच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आरसीबी सामन्यासाठी पाच ऐवजी तीन तिकिटांची मागणी प्रत्येक आमदार आणि खासदारासाठी केली होती.

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या वक्तव्यानंतर या वादाला फोडणी मिळाली. इतकंच काय तर तिकीटांचा गैरवापर होईल असे आरोप लावले गेले. पण कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी तिकीटं ऑनलाईन विकत घेतली जातात, त्यामुळे विकत घेतात त्यांचा सहभाग असतो. तिकीट दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येत नाही. त्यामुळे आमदार किंवा त्यांचे कुटुंबीयच त्यांचा वापर करू शकतात. इतरांना त्यांचा वापर करता येणार नाही, असं सांगितलं. अखेर हा वाद टोकाला जात असल्याचं पाहून बीसीसीआयने लागलीच पावलं उचलली. बीसीसीआयने बंगळुरूतील सामना दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला. या शिवाय दुसरा पर्याय नसल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून...
तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्ष...
Sanjay Raut | तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्षांबाबत खळबळजनक विधान
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?
लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
Railway Updates | लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...