AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएलच्या सर्वच्या सर्व 18 पर्वात हे 8 खेळाडू खेळणार! फक्त आर अश्विनचं नशिब निघालं फुटकं

आयपीएलचं 18वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या पर्वात सर्वच संघांनी नव्याने बांधणी केली आहे. पण दरवर्षी काही खेळाडूंची चर्चा होत असते. ते म्हणजे पहिल्या पर्वापासून आयपीएल खेळणारे खेळाडू कोण? यंदा यात एकूण 8 खेळाडूंचा समावेश आहे. पण आर अश्विनच्या बाबतीत एक गोष्ट घडली आहे.

आयपीएलच्या सर्वच्या सर्व 18 पर्वात हे 8 खेळाडू खेळणार! फक्त आर अश्विनचं नशिब निघालं फुटकं
Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 17, 2025 | 9:56 PM
Share

आयपीएल स्पर्धेबाबत क्रीडाप्रेमींमध्ये कायम उत्सुकता आहे. क्रिकेटचा खराखुरा आनंद लुटण्याची मेजवाणी असते. सामना कधी कोणत्या क्षणाला फिरेल सांगता येत नाही. अशा या खेळाचा रोमांच 22 मार्चपासून अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा 2008 पासून सुरु झाली आहे आणि यंदाचं 18वं पर्व आहे. या स्पर्धेत 8 खेळाडू असे आहेत जे पहिल्या पर्वापासून या स्पर्धेचा भाग आहेत. त्यांचा फॉर्म आणि खेळ पाहता ते दिग्गज खेळाडूंच्या श्रेणीत बसले आहेत. आयपीएल 2025 मध्ये लीगच्या पहिल्या हंगामात खेळणारे 8 खेळाडू म्हणजे एमएस धोनी, आर अश्विन, विराट कोहली, रोहित शर्मा, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा आणि अजिंक्य रहाणे.. या खेळाडूंपैकी आर अश्विन पहिल्या पर्वात होता. पण त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या पर्वात तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. पण त्याला 2009 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. आता झालेल्या मेगा लिलावानंतर आर अश्विन चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे.

दुसरीकडे, आठ खेळाडूंपैकी फक्त चार खेळाडूंनी लीगच्या प्रत्येक पर्वात किमान एक सामना खेळला आहे. एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि मनीष पांडे हे खेळाडू आयपीएलच्या प्रत्येक पर्वात खेळले आहेत. विराट कोहली सर्व पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्ज तसेच रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडूनही खेळला. रोहित शर्माने डेक्कन चार्जर्सपासून सुरुवात केली. पण गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्ससोबत खेळत आहे. दुसरीकडे, मनीष पांडे सात संघांसाठी खेळला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 264 आयपीएल सामने खेळले आहेत. रोहित शर्माने 257 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, विराट कोहलीने 252 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. रवींद्र जडेजाने 240 सामने खेळले. दुसरीकडे, अश्विनने 212 सामने, अजिंक्य रहाणेने 185 सामने, मनीष पांडेने 171 सामने आणि इशांत शर्माने 110 सामने खेळले आहेत.

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.