AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लखनौच्या स्टेडियमला प्रदूषणाचा विळखा? हार्दिक पांड्याने घातलं मास्क, AQI बाबत अशी चर्चा

लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये दृश्यमानता कमी असल्याने नाणेफेकीचा कौल लांबला. यावेळी मैदानात अष्टपैलू हार्दिक पांड्या मास्क घालून खेळताना दिसला. त्याचे फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. असं असताना प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लखनौच्या स्टेडियमला प्रदूषणाचा विळखा? हार्दिक पांड्याने घातलं मास्क, AQI बाबत अशी चर्चा
लखनौच्या स्टेडियमला प्रदूषणाचा विळखा? हार्दिक पांड्याने घातलं मास्क, AQI बाबत अशी चर्चाImage Credit source: Twitter
| Updated on: Dec 17, 2025 | 8:58 PM
Share

India vs South Africa, 4th T20I: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील निर्णायक सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजयेपी इकाना स्टेडियममध्ये होत आहे. पण हा सामना काही वेळेत सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे नाणेफेकीचा वेळ वारंवार पुढे ढकलण्यात आली. आता हा सामना होणार की नाही याबाबत शंका आहे. कारण मैदानाती दृश्यमानता खूपच कमी आहे. त्यामुळे फलंदाजांना फलंदाजी करताना आणि क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण करताना त्रासाला सामोरं जावं लागू शकतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल वारंवार लांबवला जात आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर हा सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते. असं असताना मैदानात हार्दिक पांड्या मास्क घालून उतरला होता. लखनौला असलेल्या प्रदूषणाच्या विळख्यामुळे मास्क घालून उतरल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर लखनौचं प्रदूषण 400च्या पार असल्याचा दावाही केला जात आहे. इतकं प्रदूषण असणं आरोग्यासाठी घातक आहे. कारण हा स्तर अत्यंत हानिकारक आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्याने काही काळ मास्क घातलं होतं. पण त्यानंतर विना मास्क मैदानात उतरला. तसेच इतर खेळाडूही मास्कशिवाय मैदानात उतरले. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंनी मास्क घातले नव्हते. हवामान वेबसाईटनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता लखनौचा AQI क्षमतेपेक्षा जास्त होता. लखनौ टी20 सामन्यासाठी टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होणार होता. पण तसं झालं नाही. दर अर्ध्या तासांनी पंचांकडून तपासणी केली जात आहे. आता रात्री 9 वाजता पुन्हा एकदा मैदानाचा आणि दृष्यमानतेचा अंदाज घेतला जाईल.

धुकं आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टी क्रिकेटसाठी भविष्यात मारक ठरू शकतात. कारण बहुतांश वनडे आणि टी20 सामने रात्री उशिरापर्यंत चालतात. अशा स्थितीत धुकं आणि प्रदूषणाची अशी स्थिती राहिली तर दिल्ली, लखनौ आणि चंदीगडमध्ये अर्थात उत्तर भारतात सामन्यांचं आयोजन करणं कठीण जाईल. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धा जवळ आली आहे. जर अशी स्थिती राहिली तर जगभरात नाचक्की होईल. 2023 त्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दिल्लीत झालेल्या बांग्लादेश श्रीलंका सामन्यापूर्वीही असाच प्रश्न उपस्थित झाला होता.दोन्ही संघांनी सराव सत्र रद्द केलं होतं. 2017 मध्ये श्रीलंकेचा संघाने दिल्ली कसोटी दरम्यान मास्क घातलं होतं.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.