AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्ये

अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 6 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आहे. भारताने 252 धावा केल्या आहेत. आता भारतीय गोलंदाज आणि पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई असणार आहे.

IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्ये
IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्येImage Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
| Updated on: Feb 01, 2026 | 5:28 PM
Share

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीत भारत पाकिस्तान सामन्याची रंगत वाढली आहे. कारण या सामन्यातील दुसऱ्या डावात ट्वीस्ट आला आहे. पाकिस्तानने नाणेफेकीच कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच भारताला 252 धावांवर रोखलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व गडी गमवून 252 धावा केल्या. तसेच विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान सोपं वाटतं असलं तरी खेळपट्टी काय फलंदाजीला पूरक नाही. त्यामुळे पाकिस्तानसाठी हे आव्हान खडतर असणार आहे. खरं तर आव्हानापेक्षा हा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात विजयी संघ उपांत्य फेरी गाठणार आहे. भारताला विजय मिळाला तर उपांत्य फेरीत पोहोचेल. पण पाकिस्तानसाठी हे गणित सोपं नाही. पाकिस्तानला नुसता विजय मिळवून चालणार नाही. तर त्याला नेट रनरेटचं गणित सोडवावं लागणार आहे.

गट 2 मधून इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यापैकी एक संघ उपांत्य फेरी गाठे. भारताने 3 सामन्यात विजय मिळवून 6 आणि +3.337 नेट रनरेट आहे. तर पाकिस्तानने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुण आणि नेट रनरेट 1.484 आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजय तर मिळवावा लागेल. तरच सहा गुण होतील. पण भारताचेही सहा गुण असल्याने नेट रनरेटचं गणित सोडवाणं भाग आहे. पाकिस्तानला यासाठी भारताने विजयासाठी दिलेले 253 धावांचं आव्हान 33.3 षटकात पूर्ण करावं लागणार आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज आणि पाकिस्तानी फलंदाज यांचा कस लागणार आहे.

भारताने हा सामना जिंकला तर थेट गट 2 मध्ये पहिलं स्थान गाठेल. त्यामुळे उपांत्य फेरीत अफगाणिस्तानशी लढत होईल. पण हा सामना गमावला आणि पाकिस्तानपेक्षा नेट रनरेट चांगला असेल तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी लढत होईल. त्यामुळे भारत उपांत्य कोणाशी लढत करणार हे देखील या सामन्यात ठरेल. दुसरीकडे, पाकिस्ताननं हे आव्हान 30 षटकात पूर्ण केलं तरी दुसऱ्या स्थानावर राहील. पाकिस्तानला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना करावा लागेल.

Follow Us
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल