AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरसीबीने अंतिम फेरी गाठताच विजय माल्ल्याने दिला असा सल्ला, म्हणाला…

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपलं स्थान निश्चित केलं आहे. अंतिम फेरीचा सामना 3 जूनला होणार आहे. आरसीबीने अंतिम फेरी गाठल्यानंतर विजय माल्याने संघाचं कौतुक केलं आहे. तसेच अंतिम सामन्यापूर्वी एक सल्ला दिला आहे.

आरसीबीने अंतिम फेरी गाठताच विजय माल्ल्याने दिला असा सल्ला, म्हणाला...
आरसीबी आणि विजय माल्ल्याImage Credit source: TV9 Network/Kannada
| Updated on: May 30, 2025 | 5:09 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जागा पक्की केली आहे. क्वॉलिफायर 1 फेरीत पंजाब किंग्सचा धुव्वा उडवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता जेतेपदापासून एक विजय दूर आहे. नऊ वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी 2016 मध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. मात्र पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठल्याने जेतेपदाची आस आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे माजी मालक विजय माल्ल्या याने संघाचं अभिनंदन केलं आहे. तसेच एक्स खात्यावर आरसीबी संघाचं कौतुक करत खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे.

“पंजाब किंग्जवर एकतर्फी विजय मिळवून आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल आरसीबीचे अभिनंदन. तणावपूर्ण स्पर्धेत ही एक उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी होती. पुरस्काराकडे वाटचाल करत राहा. अंतिम सामन्यात धैर्याने खेळा.” अशी पोस्ट विजय माल्ल्याने लिहिली आहे. विजय माल्ल्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

विजय मल्ल्या हे आरसीबी संघाचे संस्थापक आहेत. २००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीग संघांसाठी झालेल्या बोलीमध्ये माल्ल्याने आरसीबी संघ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यांनी ते विकत घेतले. पण 2016 मध्ये आर्थिक संकटाचा सामना करणारा आणि कर्जबाजारी झालेला विजय माल्ल्या भारतातून पळून गेला आणि आता इंग्लंडमध्ये राहत आहे. त्याने बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवले आहेत. आरसीबी संघ सध्या युनायटेड स्पिरिट्सच्या मालकीचा आहे.

आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स सामना

आरसीबी संघाचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जचा संघ 14.1 षटकात 101 धावांवर सर्वबाद झाला. 102 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीला फिल सॉल्टने (56) धमाकेदार सुरुवात दिली. या शानदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 षटकांत 106 धावा केल्या आणि 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.