विराट कोहलीने ODI आणि Test टीमच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं : शाहिद आफ्रिदी

टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला आतापर्यंत एकही आयसीसी विजेतेपद मिळवून दिलेले नाही.

विराट कोहलीने ODI आणि Test टीमच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं : शाहिद आफ्रिदी
Virat Kohli
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 3:54 PM

मुंबई : टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला आतापर्यंत एकही आयसीसी विजेतेपद मिळवून दिलेले नाही. यावेळी टी-20 विश्वचषक जिंकून हा दुष्काळ संपवण्याचा त्याचा प्रयत्न होता पण तसे झाले नाही. या संघाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. या स्पर्धेत संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. विराट कोहलीची बॅटही फारशी चालली नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. आफ्रिदीला वाटते की भारतीय कर्णधार विराट कोहलीने फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधाराची भूमिका सोडली पाहिजे. (Virat Kohli should be relieved from ODI and Test captaincy responsibilities : Shahid Afridi)

‘समा टीव्ही’ वाहिनीवर बोलताना आफ्रिदी म्हणाला की, रोहित शर्माला भारतीय टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा बीसीसीआयचा निर्णय चांगला आहे. भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेच्या शेवटी कोहलीने T20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. “मला वाटते की विराट भारतीय क्रिकेटसाठी एक अद्भुत शक्ती आहे, परंतु मला असेही वाटते की त्याने आता सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला तर ते चांगले होईल.

रोहितची मानसिकता मजबूत

आफ्रिदी आयपीएल-2008 मध्ये डेक्कन चार्जेसमध्ये रोहित शर्मासोबत खेळला आहे. एका चांगल्या कर्णधाराकडे जे गुण हवेत ते रोहितकडे आहेत, रोहितकडे मानसिक ताकद आहे आणि त्याने ती त्याच्या आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दाखवून दिली आहे. तो म्हणाला, “मी रोहितसोबत एक वर्ष खेळलोय आणि तो एक मजबूत मानसिकता असलेला अद्भुत खेळाडू आहे. त्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला हवं तेव्हा तो रिलॅक्स राहतो. तसेच जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तो आक्रमकता देखील दाखवू शकतो. तो एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, त्याचं शॉट सिलेक्शन अप्रतिम आहे. खेळाडूंसाठी एक चांगला लीडर बनण्याची त्याची मानसिकता आहे.

कोहलीकडून खूप अपेक्षा होत्या

कोहलीच्या टी-20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर आफ्रिदी म्हणाला की, मला त्याची अपेक्षा होती. आफ्रिदीला वाटते की कोहलीने कर्णधारपद सोडून तिन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे आणि त्याचा आनंद घ्यावा. आफ्रिदी म्हणाला, “मला वाटते की विराटने कर्णधारपद सोडले पाहिजे आणि त्याच्या उर्वरित क्रिकेटचा आनंद घ्यावा. मला वाटते की त्याच्याकडे अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे. तो एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे आणि मनावर कोणतेही दडपण न घेता तो मुक्तपणे खेळू शकतो. तो त्याच्या क्रिकेटचा आनंद घेईल.

33 वर्षीय विराटने अलीकडेच आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपलेल्या रवी शास्त्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोहली एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडू शकतो आणि केवळ कसोटी संघाचे नेतृत्व करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो जो त्याचा आवडता फॉर्मेट आहे असे संकेत दिले होते. 2019 पासून कोहलीने एकही कसोटी शतक झळकावलेले नाही.

इतर बातम्या

T20 World Cup Final live streaming: टी20 विश्वचषकाचा महामुकाबला, ऑस्ट्रेलियासमोर न्यूझीलंडचा संघ, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना

‘पाकिस्तानचा पराभव माझ्या जावयामुळे,’ शाहीद आफ्रिदीने शाहीनला ठरवलं जबाबदार, म्हणतो यॉर्कर टाकायची अक्कल नाही!

उनाडकटला पुन्हा संधी नाहीच, नाराज जयदेवने VIDEO शेअर करत बीसीसीआयवर साधला निशाणा

(Virat Kohli should be relieved from ODI and Test captaincy responsibilities : Shahid Afridi)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.