AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : आज 5 वाजताच्या विराट कोहलीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष, तिसऱ्या कसोटीतील रणनीती ठरणार!

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटल्यानंतर भारताने दुसरा सामना जिंकत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

IND vs ENG : आज 5 वाजताच्या विराट कोहलीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष, तिसऱ्या कसोटीतील रणनीती ठरणार!
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 12:49 PM
Share

लंडन : इंग्लंड (England) विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 च्या आघाडीवर असणारा भारतीय संघ आघाडी 2-0 ची करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  त्यासाठी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज सायंकाळी 5 वाजता काही महत्त्वाचे निर्णय़ घेणार आहे. कोहली आज सायंकाळी 5 वाजता सामन्याआधीची पत्रकार परिषद घेणार असून यावेळी तो काय बोलणार?, काय निर्णय़ घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हेडिंग्ले येथे उद्यापासून (25 ऑगस्ट) सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय संघ (Team India) काय रणनीती आखणार? कोणत्या खेळाडूंना खेळवले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विराट कोहलीकडे सध्या निर्णय घेण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न हा गोलंदाजी असून नेमके कोणते गोलंदाज खेळवायचे? हा प्रश्न आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या 4 वेगवान गोलंदाजासह रवींद्र जाडेजा या एका फिरकीपटूला घेऊन विराट मैदानात उतरला होता. आता तिसऱ्या टेस्टमध्ये विराट हीच रणनीती कायम ठेवणार की बदल करणार हे पाहावे लागेल.

अश्विनबाबतचा निर्णय आज सायंकाळी 5 वाजता!

कसोटी क्रिकेटचा विषय येताच भारताचा प्रमुख खेळाडू म्हणून आर अश्विनचे नाव समोर येते. जगातील सध्याचा अव्वल क्रमाकांचा फिरकीपटू आणि एक विश्वासू फलंदाज असणारा आश्विन पहिल्या दोन कसोटी सामन्यांत संघात नव्हता. त्यानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आश्विनला संघात घेण्याबाबत भाष्य केलं. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीत आश्विनला संधी मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर आज सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेतच मिळेल.

इतर बातम्या

IND vs ENG : इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, आणखी एक खेळाडू तिसऱ्या कसोटीला मुकणार, गोलंदाजी विभागाच्या अडचणी वाढल्या

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय पक्का, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली 5 महत्त्वाची कारणं

इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर दोन खेळाडूंची एकत्र निवृत्ती, दोघेही दिग्गज फलंदाज

(Virat kohli will decide third match plan today at prematch press conference)

Follow Us
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.