IND vs ENG : आज 5 वाजताच्या विराट कोहलीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष, तिसऱ्या कसोटीतील रणनीती ठरणार!

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटल्यानंतर भारताने दुसरा सामना जिंकत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

IND vs ENG : आज 5 वाजताच्या विराट कोहलीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष, तिसऱ्या कसोटीतील रणनीती ठरणार!
विराट कोहली
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 12:49 PM

लंडन : इंग्लंड (England) विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 च्या आघाडीवर असणारा भारतीय संघ आघाडी 2-0 ची करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  त्यासाठी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज सायंकाळी 5 वाजता काही महत्त्वाचे निर्णय़ घेणार आहे. कोहली आज सायंकाळी 5 वाजता सामन्याआधीची पत्रकार परिषद घेणार असून यावेळी तो काय बोलणार?, काय निर्णय़ घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हेडिंग्ले येथे उद्यापासून (25 ऑगस्ट) सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय संघ (Team India) काय रणनीती आखणार? कोणत्या खेळाडूंना खेळवले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विराट कोहलीकडे सध्या निर्णय घेण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न हा गोलंदाजी असून नेमके कोणते गोलंदाज खेळवायचे? हा प्रश्न आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या 4 वेगवान गोलंदाजासह रवींद्र जाडेजा या एका फिरकीपटूला घेऊन विराट मैदानात उतरला होता. आता तिसऱ्या टेस्टमध्ये विराट हीच रणनीती कायम ठेवणार की बदल करणार हे पाहावे लागेल.

अश्विनबाबतचा निर्णय आज सायंकाळी 5 वाजता!

कसोटी क्रिकेटचा विषय येताच भारताचा प्रमुख खेळाडू म्हणून आर अश्विनचे नाव समोर येते. जगातील सध्याचा अव्वल क्रमाकांचा फिरकीपटू आणि एक विश्वासू फलंदाज असणारा आश्विन पहिल्या दोन कसोटी सामन्यांत संघात नव्हता. त्यानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आश्विनला संघात घेण्याबाबत भाष्य केलं. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीत आश्विनला संधी मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर आज सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेतच मिळेल.

इतर बातम्या

IND vs ENG : इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, आणखी एक खेळाडू तिसऱ्या कसोटीला मुकणार, गोलंदाजी विभागाच्या अडचणी वाढल्या

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय पक्का, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली 5 महत्त्वाची कारणं

इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर दोन खेळाडूंची एकत्र निवृत्ती, दोघेही दिग्गज फलंदाज

(Virat kohli will decide third match plan today at prematch press conference)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.