AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय पक्का, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने सांगितली 5 महत्त्वाची कारणं

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटल्यानंतर भारताने दुसरा सामना जिंकत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 6:11 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे पार पडणार आहे. सध्या भारत मालिकेत 1-0 ने पुढे असून तिसरी कसोटी देखील भारतच जिंकेल असा दावा कारणासहीत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने केला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे पार पडणार आहे. सध्या भारत मालिकेत 1-0 ने पुढे असून तिसरी कसोटी देखील भारतच जिंकेल असा दावा कारणासहीत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने केला आहे.

1 / 6
नासिर हुसैनने सर्वात पहिलं कारण सांगितलं विराट कोहली (Virat kohli).  विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहे. त्याची आक्रमकता संघाला जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. विराट फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत नसला तरी भारताच्या विजयात त्याची कर्णधारी एक महत्त्वाचं कारण असल्याचं नासिरने सांगितलं आहे.

नासिर हुसैनने सर्वात पहिलं कारण सांगितलं विराट कोहली (Virat kohli). विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहे. त्याची आक्रमकता संघाला जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. विराट फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत नसला तरी भारताच्या विजयात त्याची कर्णधारी एक महत्त्वाचं कारण असल्याचं नासिरने सांगितलं आहे.

2 / 6
नासिरने तिसऱ्या कसोटीत भारत विजयी होण्यासाठी आणखी एक बलाढ्या कारण भारताची भेदक गोलंदाजी सांगितलं. बुमराह एक शांत खेळाडू असला तरी त्याची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करुन सोडते. त्यात इतरही गोलंदाज उत्तम कामगिरी करत असून या सर्वांना विराटच्या आक्रमकतेची जोड मिळत असल्याने भारतासाठी हे फायद्याचं ठरत असल्याचंही नासिरनं सांगितलं आहे.

नासिरने तिसऱ्या कसोटीत भारत विजयी होण्यासाठी आणखी एक बलाढ्या कारण भारताची भेदक गोलंदाजी सांगितलं. बुमराह एक शांत खेळाडू असला तरी त्याची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करुन सोडते. त्यात इतरही गोलंदाज उत्तम कामगिरी करत असून या सर्वांना विराटच्या आक्रमकतेची जोड मिळत असल्याने भारतासाठी हे फायद्याचं ठरत असल्याचंही नासिरनं सांगितलं आहे.

3 / 6
इंग्लंडचा संघ सध्या खराब खेळत असला तरी दुखापतींनी देखील इंग्लंडच्या संघाला पछाडले आहे.  स्टुअर्ट ब्रॉड, क्रिस वोक्स, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर असे दिग्गज खेळाडू मालिकेबाहेर असल्याने संघ आधीच अडचणीत आहे. आता या सर्वांमध्ये मार्क वुडचे नावही जोडले गेले आहे. वुडही दुखापतग्रस्त झाल्याने इंग्लंडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे इंग्लंड तिसरी कसोटी पराभूत होऊ शकतो, असं नासिरनं सांगितलं आहे.

इंग्लंडचा संघ सध्या खराब खेळत असला तरी दुखापतींनी देखील इंग्लंडच्या संघाला पछाडले आहे. स्टुअर्ट ब्रॉड, क्रिस वोक्स, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर असे दिग्गज खेळाडू मालिकेबाहेर असल्याने संघ आधीच अडचणीत आहे. आता या सर्वांमध्ये मार्क वुडचे नावही जोडले गेले आहे. वुडही दुखापतग्रस्त झाल्याने इंग्लंडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे इंग्लंड तिसरी कसोटी पराभूत होऊ शकतो, असं नासिरनं सांगितलं आहे.

4 / 6
नासिरनं सांगितलेल्या कारणांमध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण आहे भारताचा हिटमॅन रोहित शर्मा. सध्या तो संघातील एक्स फॅक्टर असून ज्याप्रकारे तो फलंदाजी करतो ते पाहून भारताला तिसऱ्या कसोटीतही याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया नासिरने दिली आहे. रोहितने दुसऱ्या कसोटीत ठोकलेल्या 83 धावां भारताच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या.

नासिरनं सांगितलेल्या कारणांमध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण आहे भारताचा हिटमॅन रोहित शर्मा. सध्या तो संघातील एक्स फॅक्टर असून ज्याप्रकारे तो फलंदाजी करतो ते पाहून भारताला तिसऱ्या कसोटीतही याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया नासिरने दिली आहे. रोहितने दुसऱ्या कसोटीत ठोकलेल्या 83 धावां भारताच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या.

5 / 6
या सगळ्यानंतर आर आश्विन एक कारण असू शकते ज्यामुळे भारत तिसरी कसोटी जिंकू शकतो. आश्विन इंग्लंड दौऱ्यात अजून एकही कसोटी खेळला नसला तरी त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी भारतासाठी सामना जिंकवून देऊ शकते असं नासिरनं म्हटलं आहे.

या सगळ्यानंतर आर आश्विन एक कारण असू शकते ज्यामुळे भारत तिसरी कसोटी जिंकू शकतो. आश्विन इंग्लंड दौऱ्यात अजून एकही कसोटी खेळला नसला तरी त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी भारतासाठी सामना जिंकवून देऊ शकते असं नासिरनं म्हटलं आहे.

6 / 6
Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!