AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय फलंदाजी ‘या’ खेळाडूमुळे बदलली, सर रिचर्डशीही तुलना, पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक

पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलैन मुश्ताक यांनी भारताच्या माजी सलामीवीराची प्रशंसा केली आहे.

भारतीय फलंदाजी 'या' खेळाडूमुळे बदलली, सर रिचर्डशीही तुलना, पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक
विरेंद्र सेहवाग
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 6:04 PM
Share

कराची : पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलैन मुश्ताक (Saqlain Mushtaq) हे पाकिस्तानच्या गोलंदाजीतील एक महत्त्वाच हत्यार. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांच्या विकेट घेतल्या होत्या. त्यांनी भारतीय फलंदाजीबद्दल एक मोठ वक्तव्य केलं असून भारताची फलंदाजी आक्रमक करण्यात भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याच मोठ योगदान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारताच्या कसोटी इतिहासांत सेहवाग सर्वांत महत्त्वाचा फलंदाज असल्याचही त्यांनी म्हटलं आहे. (Virendra Sehwag changed the Indian batting says Pakistan former spiner Saqlain Mushtaq)

भारतीय क्रिकेट इतिहासात सर्वांत स्फोटक फलंदाज म्हणून सेहवागला ओळखलं जात. सेहवागचा कसोटी सामन्यांत स्ट्राइक रेट 82.2, एकदिवसीय सामन्यांत 104.3 आणि टी-20 मध्ये 145.3 इतका होता. त्यामुळे सकलैन यांच्यामते भारताची आजची आक्रमक फलंदाजीमागे सेहवागने रचलेला पायाच महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे सेहवागने कसोटीतील आपले पहिले त्रिशतक हे सकैलन यांच्या चेंडूवर सिक्सर ठोकत पूर्ण केले होते. आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना सकलैन म्हणाले, “संपूर्ण जागतिक क्रिकेटवर सेहवागच्या फलंदाजीचा वेगळा प्रभाव होता. त्याच्या आक्रमक क्रिकेटचा अनेक भारतीय फलंदाजाना फायदा झाला. त्याच्या फलंदाजीच्या स्टाईलने भारतीय क्रिकेटची मानसिकताच बदलून ठेवली.”

सेहवागची विव रिचर्डस यांच्याशी तुलना

सकलैन म्हणाले, ”सेहवागने स्वत:साठी खेळतानाच देशासाठी खेळणे ही तितकेच महत्त्वाचे समजले. ज्यामुळे येणाऱ्या फलंदाजाची मानसिकता त्याने बदलली. सेहवाग आधी वेस्ट इंडिज संघाचे दिग्गज क्रिकेटर सर विवियन रिचर्डसही अशी फलंदाजी करत. त्यांनी फलंदाजीतून जगावर राज्य केलं तसाच दबदबा सेहवागने देखील प्रस्थापित केला.”

हे ही वाचा :

टीम इंडियाला क्रिकेट विश्वचषक मिळवून दिला, आता 28 व्या वर्षीच भारताला बाय बाय, देशही सोडला

ICC Meeting : क्रिकेट इतिहासातील ‘ती’ मोठी स्पर्धा पुन्हा खेळवली जाणार, भारताला पाकिस्तानकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी

दुबईत ठरलं…. 8 वर्षांत होणार 16 वर्ल्ड कप फायनल, प्रत्येक वर्षी भारत पाकिस्तान थरार!

(Virendra Sehwag changed the Indian batting says Pakistan former spiner Saqlain Mushtaq)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली