AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकोट कसोटी दरम्यान अश्विनच्या घरी नेमकं काय घडलं होतं? पत्नीने आता सर्वकाही केलं उघड

इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना राजकोट येथे पार पडला. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने 500 विकेट्सचा टप्पा गाठला होता. त्यामुळे अश्विन या सामन्यात आणखी गडी बाद करणार असं चाहत्यांना वाटलं होतं. पण आर अश्विनला सामना मध्यातच सोडून घरी जावं लागलं. त्याची पुसटशी कारणं लोकांना माहिती होती. पण आता आर अश्विनच्या पत्नीने सर्व उलगडा केला आहे.

राजकोट कसोटी दरम्यान अश्विनच्या घरी नेमकं काय घडलं होतं? पत्नीने आता सर्वकाही केलं उघड
राजकोट कसोटी मध्यातच सोडून जाण्याचं कारण आलं समोर, आर अश्विनच्या पत्नीने सर्वकाही सांगितलं
| Updated on: Mar 06, 2024 | 3:21 PM
Share

मुंबई : आर अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अनेक विक्रम रचले आहेत. पाचवा कसोटी सामना खेळताच आर अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. अश्विन 100 कसोटी सामना खेळणारा 14 वा भारतीय खेळाडू ठरणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक वेळ अशी आली की अश्विनला सामना अर्धवट सोडून घरी परतावं लागलं होतं. घरी काहीतरी गडबड झाली असावी असा अंदाज क्रीडाप्रेमींनी मांडला होता. त्यानंतर आर अश्विनच्या पत्नीने 500 वी विकेट ते 501 व्या विकेट दरम्यान बरंच काही घडल्याचं सांगितलं होतं. आता आर अश्विनच्या पत्नीने खरं काय झालं ते सांगून टाकलं आहे. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आर अश्विन मैदानात दिसला नाही. थेट चौथ्या दिवशी आर अश्विन चार्टर्ड प्लेनने राजकोटला पोहोचला आणि गोलंदाजी केली. तसेच एक विकेट घेतली. पण त्या 24 तासात बरंच काही घडल्याचं आर अश्विनच्या पत्नीने सांगितलं आहे.

“अश्विनची आई त्या दिवशी घरात पडली होती आणि त्यासाठी अश्विनला रात्रीत घरी फ्लाइट पकडून यावं लागलं होतं.”, असं आर अश्विनच्या पत्नीनं सांगितलं आहे आहे. या घटनेबाबत आर अश्विनने सोशल मीडियावर काहीच लिहिलं नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या कॉलममध्ये अश्विनच्या पत्नीने लिहिलं की, “अश्विनची आई अचानक पडली. त्यानंतर कुटुंबियांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर अश्विनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.”

या घटनेनंतर अश्विनच्या पत्नीने थेट त्याला फोन न करता पुजाराला केला. अश्विनची पत्नी प्रीतीने सांगितलं की, ‘सामन्यादरम्यान मुलं शाळेतून घरी परतली होती आणि त्याने 500 वी विकेट घेतली. आम्ही सर्वांना फोनवरून शुभेच्छा देत होतो. तेव्हा आई पडल्याचा अचानक आवाज आला आणि आमची धावाधाव झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी अश्विनला तात्काळ घरी पाठवलं. अश्विन घरी रात्री उशिरा आला तेव्हा आई आयसीयूत होती. आईनेच पुढच्या दिवशी परत जाण्याची विनंती केली. पण अश्विनला आईसोबत राहायचं होतं.’

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.