AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर काय? जाणून घ्या

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता हळूहळू पुढे जात आहे. पाचव्या टप्प्यानंतर उपांत्य फेरीचं गणितही स्पष्ट होताना दिसेल. दुसरीकडे, उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर काय? असा प्रश्न पडला आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर काय? जाणून घ्या
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर काय? जाणून घ्या
| Updated on: Oct 18, 2023 | 8:43 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना कोणीही विसरू शकत नाही. सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला. तिथेही टाय झाला आणि चौकारांच्या संख्येवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. न्यूझीलंडच्या हातातोंडचा घास असा हिरावून गेला. त्यामुळे या निर्णयावर अनेक आजी माजी खेळाडूंनी टीका केली होती. त्यामुळे यंदाही उपांत्य आणि अंतिम फेरीत अशी स्थिती निर्माण झाली तर काय नियम असेल? असा प्रश्न विचारला जात आहे. खरं तर स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच आयसीसीने आपल्या नियमात बदल केला आहे. पण अनेक क्रीडा रसिकांना याबाबतची माहिती नाही. साखळी फेरीत सामना टाय झाला तर प्रत्येकी एक गुण दिला जाईल. पण उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी आयसीसीने नव्या नियमाची भर घातली आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी सुपर ओव्हरचा नियम ठेवला गेला आहे. म्हणजेच साखळी फेरीत सुपर ओव्हर होणार नाही. तसेच दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. जर उपांत्य फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हरमधून निकाल दिला जाईल. त्यातही सामना टाय झाला तर पुन्हा सुपर ओव्हर केली जाईल. निकाल येईपर्यंत सुपर ओव्हर खेळल्या जातील. म्हणजेच क्रीडा रसिकांना थरार अनुभवायला मिळेल.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 10 संघ आहेत. यापैकी गुणतालिकेत टॉप 4 वर असलेल्या संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. सध्याच्या स्थितीत गुणतालिकेत भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे संघ टॉपला आहेत. अव्वल स्थानी असलेला संघ चौथ्या स्थानावर संघाशी सामना खेळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ आमनेसामने येतील. पहिला उपांत्य फेरीचा साना 15 नोव्हेंबरला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 16 नोव्हेंबरला होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारी होणार आहे. पुण्यातील एमसीए मैदानावर हा सामना होणार आहे. बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकताच टीम इंडियाला अव्वल स्थान गाठता येणार आहे.

Follow Us
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा