AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 गुणतालिकेत टॉप 2 स्थान मिळण्यासाठी आरसीबी आणि एसआरएचला काय करावं लागणार? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी स्थान मिळवलं आहे. पण आता या दोन संघात टॉप 2 मध्ये राहण्याची चुरस आहे. चला जाणून या दोन संघांना काय करावं लागणार ते...

IPL 2026 गुणतालिकेत टॉप 2 स्थान मिळण्यासाठी आरसीबी आणि एसआरएचला काय करावं लागणार? जाणून घ्या
IPL 2026 गुणतालिकेत टॉप 2 स्थान मिळण्यासाठी आरसीबी आणि एसआरएचला काय करावं लागणार? जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 22, 2026 | 5:41 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 67व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. असं असताना आता या दोन संघात गुणतालिकेतील टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याची धडपड आहे. आरसीबीने आतापर्यंत 13 सामन्यात 9 सामने जिंकले आहेत. तसेच पदरात 18 गुण असून नेट रनरेट हा +1.065 आहे. यासह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने 13 सामन्यापैकी 8 सामने जिंकले असून 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादचे नेट रनरेट हा +0.350 आहे. पण या दोघांच्या मधे म्हणजेच दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. गुजरात टायटन्सने 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला असून 18 गुण आणि +0.695 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 2 मध्ये जागा पक्की करण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्याचं गणित समजून घेऊयात

आरसीबीचं गणित कसं असेल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा टॉप 2 मधील प्रवास सोपा आहे. सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं तर 20 गुण होतील. त्यामुळे आसपास कोणीच नाही. त्यामुळे अव्वल स्थान कायम राहील. तसेच क्वॉलिफायर 1 खेळण्याची संधी मिळेल. आरसीबीने विजय मिळवला तर गुजरात टायटन्सचं दुसरं स्थानही कायम राहील. अशा स्थितीत आरसीबी आणि गुजरात टायटन्स हे क्वॉलिफायर 1 मध्ये खेळतील. अव्वल दोनमध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी केवळ दोन संधीच मिळत नाहीत, तर एलिमिनेटरमधील थेट बाद होण्याचा दबावही टाळता येतो. दुसरीकडे, आरसीबीने हा सामना मोठ्या फरकाने गमावला तर गुजरातची तिसऱ्या स्थानावर घसरण होईल. तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर खेळेल.

सनरायझर्स हैदराबादचं गणित काय?

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादला अव्वल स्थान गाठणं सोपं नाही. कारण नेट रन रेटमधील तफावत दूर करण्यासाठी आरसीबीला नुसतं हरवून चालणार नाही. यासाठी मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची प्रथम फलंदाजी आली तर सामना किमान 87 धावांनी जिंकावा लागेल. जर धावांचा पाठलाग करावा लागला तर दिलेलं लक्ष्य 11 षटकात पूर्ण करावं लागेल. विशिष्ट परिस्थितीत 11.3 षटकेदेखील पुरेशी ठरू शकतात. त्यामुळे गुजरात टायटन्सचं या सामन्याकडे लक्ष असणार आहे.

Follow Us
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवार
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत...
एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक!
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी...
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट
NDA प्रवेशाच्या चर्चांवर संजय गायकवाडांचं मोठं विधान
शरद पवार आहेत तोपर्यंत...; NDA प्रवेशाच्या चर्चांवर संजय गायकवाडांचं मोठं विधान
आघाडी सरकारने 14 कारणं देत...मिसिंग लिंकचा फडणवीसांनी इतिहास मांडला, व
आघाडी सरकारने 14 कारणं देत...मिसिंग लिंकचा फडणवीसांनी इतिहास मांडला, विरोधकांना घेरलं!
इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना येऊ नका, सरकारचं मोठं आवाहन
Alandi Indrayani River Flood | पालखीपूर्वीच आळंदी संकटात! इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना येऊ नका, सरकारचं मोठं आवाहन