AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 नंतर विराट कोहली काय करणार? फलंदाजीसाठी आता….

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहली काही खास करू शकला नाही. मोक्याच्या सामन्यात 43 धावांची खेळी करून तंबूत परतला. यासाठी त्याने 35 चेंडूंचा सामना केला हे विशेष... आता आयपीएल संपल्यानंतर काय करणार असा प्रश्न आहे.

IPL 2025 नंतर विराट कोहली काय करणार? फलंदाजीसाठी आता....
विराट कोहलीImage Credit source: PTI
| Updated on: Jun 03, 2025 | 11:14 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोहलीची बॅटिंग झाली आहे. आता पुढचा हंगाम एका वर्षांनी असणार आहे. त्यामुळे आता विराट कोहलीला फलंदाजी करताना कधी पाहता येईल, यासाठी त्याचे चाहते अधीर आहेत. कारण विराट कोहलीने कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट कोहलीने आयपीएल स्पर्धा सुरु असताना कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. 12 मे रोजी त्याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. म्हणून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार नाही. त्यामुळे आता विराट कोहली फलंदाजी करताना त्याच्या चाहत्यांना लवकर दिसणार नाही. पण यासाठी किती काळ वाट पाहावी लागेल याबाबत चाहते आतुर आहेत. तर विराट कोहलीला परत मैदानावर फलंदाजी करताना पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण विराट कोहली आता फक्त वनडे सामने खेळणार आहे.

ऑगस्टमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. अशा परिस्थितीत, कोहली या मालिकेतूनच क्रिकेट मैदानावर दिसू शकतो. या मालिकेसाठी टीम इंडियाला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. ही मालिका 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. पण विराट कोहली या मालिकेत खेळेल की नाही हे सध्या स्पष्ट नाही.

जर विराट या मालिकेत खेळला नाही तर चाहत्यांची वाट ऑक्टोबरपर्यंत वाढेल कारण त्यानंतर टीम इंडिया मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाईल. हा दौरा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आहे. या मालिकेत 3 एकदिवसीय सामने खेळले जातील. ही मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

विराट कोहली आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 15 सामन्यातील 15 डावात 657 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 अर्धशतकं ठोकली आहेत. पण रोमांचक सामन्यात आरसीबीचा प्रमुख फलंदाज विराट कोहली 43 धावांवर बाद झाला. यामुळे चाहते अत्यंत निराश झाले. विराट कोहलीची पत्नी, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये सामना पाहत होती, कोहलीची विकेट पाहून खूप भावनिक झाली.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.