AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: दुसऱ्या दिवसापासून…! श्रीलंकेने सामना कुठे गमावला? कर्णधार धनंजय डिसिल्वाने असं मांडलं गणित

भारताने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला 165 धावांनी नमवलं. हा पराभव श्रीलंकन कर्णधार धनंजय डिसिल्वा याच्या जिव्हारी लागला आहे. त्याने या सामन्यात कुठे गणित चुकलं ते सांगून टाकलं.

IND vs SL: दुसऱ्या दिवसापासून...! श्रीलंकेने सामना कुठे गमावला? कर्णधार धनंजय डिसिल्वाने असं मांडलं गणित
IND vs SL: दुसऱ्या दिवसापासून...! श्रीलंकेने सामना कुठे गमावला? कर्णधार धनंजय डिसिल्वाने असं मांडलं गणितImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 19, 2026 | 6:21 PM
Share

India vs Sri Lanka Test Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सरशी घेतली. पहिल्या समन्यात श्रीलंकेला 165 धावांनी पराभवाची धूळ चारली. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. खरं तर या सामन्यावरची श्रीलंकेची पकड पहिल्या डावातच सैल झाली होती. कारण भारताला 178 धावांची आघाडी मिळाली होती. त्यात दुसऱ्या डावात भारतीय संघाने कशाबशा 193 धावा केल्या. 372 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 206 धावांवर आटोपला. या पराभवामुळे श्रीलंकन कर्णधार धनंजय डिसिल्वा नाराज दिसला. त्याने चौथ्या डावात फलंदाजी करणं कठीण अशल्याचं अधोरेखित केलं. इतकंच काय तर पहिले तीन दिवस बरे गेले, पण त्यानंतर सर्व काही बदललं. नाणेफेकीचा कौलही महत्त्वाची भूमिका बजावून गेल्याचं सांगितलं.

कर्णधार धनंजय डिसिल्वा काय म्हणाला?

भारताविरुद्ध सामना गमावल्यानंतर झालेल्या बक्षीस सोहळ्याच्या कार्यक्रमात कर्णधार धनंजय डिसिल्वा याने आपली खंत मांडली. धनंजय डिसिल्वा म्हणाला की, ‘दुसऱ्या दिवसापासून आम्ही जास्तीत जास्त गेममध्ये होतो. मला वाटतं आमच्या खेळाडूंनी चौथ्या डावात चांगली लढत दिली. हे काही सोपं नव्हतं. मला वाटतं की एक चांगला सामना झाला.’ धनंजय डिसिल्वा खेळपट्टीबाबत म्हणाला की, ‘सुरूवातीचे तीन दिवस फलंदाजीसाठी चांगले होते. त्यामुळे गॉलमध्ये चौथ्या दिवशी सोपं नव्हतं. सर्वांना हे माहिती होतं. पण मला वाटतं की राहुल आणि पडिक्कलने चांगली सुरूवात करून दिली. त्यांच्या धावसंख्येमुळे आमच्यावर दबाव वाढला.’ धनंजय डिसिल्वाने पहिल्या डावात 21 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात 59 धावांवर खेळ आटोपला.

श्रीलंकन कर्णधार धनंजय डिसिल्वा याला नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरला का? असं विचारताच म्हणाला की, ‘कदाचित हा.. त्यांनी नाणेफेक जिंकून बोर्डवर धावा लावल्या. जेव्हा आम्ही फलंदाजीला आलो तेव्हा लवकर विकेट गमावल्या. तेथूनच आम्ही सामना गमावला.’ भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेला या सामन्यात विजय मिळवणं भाग आहे.

Follow Us
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी