AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत वादाची ठिणगी कुठे पडली? नवीन उल हकने आता कुठे खरं सांगितलं

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असताना गेल्या पर्वातील काही कटू गोड आठवणींना उजाळा मिळत आहे. विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत राहिला होता. त्याला आता एक वर्ष पूर्ण होईल. दरम्यान वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोघांचा समेट झाला आहे. आता कुठे नवीन उल हकने या भांडणाचं प्रमुख कारण सांगितलं आहे.

आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत वादाची ठिणगी कुठे पडली? नवीन उल हकने आता कुठे खरं सांगितलं
आयपीएलमध्ये विराट कोहलीशी पंगा होण्याचं मुख्य कारण काय? नवीन उल हकने खरं खरं सांगून टाकलं
| Updated on: Mar 04, 2024 | 1:33 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कायम स्मरणात राहणारा आहे. या स्पर्धेत जय पराजयापेक्षा रनमशिन्स विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यातील वाद चर्चेत राहिला आहे. नवीन उल हक आणि विराट कोहली या वादाचं रुपांतर नंतर विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर असं झालं. मैदानातच दोन्ही खेळाडू भिडल्याचं सर्वांनी पाहिल. सोशल मीडियावर या भांडणाचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर नवीन उल हक आणि विराट कोहली यांचं क्रिप्टिक वॉरही पाहायला मिळालं. पण वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत अफगाणिस्तान सामन्यात या वादावर पडदा पडला. दोघांनी हातमिळवणी करून सर्वकाही संपुष्टात आल्याचं सांगितलं. आता या सर्व वादावर पडदा पडला असताना नवीन उल हकने या वादाची सुरुवात कुठून झाली हे सांगितलं आहे.

नवीन उल हकने झल्मी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “मी माझ्या पूर्ण क्रिकेट करिअरमध्ये कधीच कोणाशी भांडण केलं नाही. मी कधीही भांडणाची सुरुवात करत नाही. पण जेव्हा समोरूनच वाद केला जातो तेव्हा मागेपुढे पाहात नाही. या भांडणाची सुरुवात विराट कोहलीकडून झाली होती.” या वादावर बोलल्यानंतर नवीन उल हकने विराट कोहलीची स्तुतीही केली.

नवीन उल हकने सांगितलं की, “आम्ही बंगळुरुमध्ये सामना खेळण्यासाठी गेलो होतो. तेथे आम्ही सामना जिंकला. शेवटच्या चेंडूवर आम्हाला विजय मिळाला. या सामन्यात विजयी धाव घेतल्यानंतर उत्साहात आवेश खाने हेल्मेट जमिनीवर आपटलं. कदाचित हीच बाब विराट कोहलीला आवडली नाही. त्यानंतर त्यांची टीम लखनौला आली. मी शेवटच्या स्थानावर फलंदाजी करत होतो आणि आम्ही सामना गमावला. तेव्हा मला स्लेज केलं गेलं.”

“आम्ही सामना गमावला होता आणि पराभवानंतर स्लेज केलं जाईल याची अपेक्षा नव्हती. जेव्हा हे माझ्यासोबत घडलं तेव्हा मी स्वत:ला आवरू शकलो नाही. मीही त्याच भाषेत उत्तर दिलं. सामना संपल्यानंतर हातमिळवणीपर्यंत स्लेजिंग सुरु होती. विराट कोहली आणि मोहम्मद सिराज स्लेजिंग करत होते.”, असंही नवीन उल हकने पुढे सांगितलं. पण आता वाद संपुष्टात आल्याचंही त्याने सांगितलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतच वादावर पडदा पडला आहे.

Follow Us
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?.
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला MVAचा पाठिंबा?
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला MVAचा पाठिंबा?.
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा.
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत...
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत....
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं...
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं....
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.