AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसप्रीत बुमराहला पहिलं षटक न देण्याचं कारण काय? हार्दिक पांड्याने उत्तर देत केली स्वत:ची पाठराखण

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह विकेटलेस होता. पाच सामन्यात त्याच्या पदरी निराशा पडली होती. पण सहाव्या सामन्यात त्याला पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली. पहिलं षटक हाती सोपवताच ही कमाल झाली. पण हार्दिक पांड्याने पहिलं षटक न देण्याचं कारण सांगून स्वत:ची पाठराखण केली.

जसप्रीत बुमराहला पहिलं षटक न देण्याचं कारण काय? हार्दिक पांड्याने उत्तर देत केली स्वत:ची पाठराखण
जसप्रीत बुमराहला पहिलं षटक न देण्याचं कारण काय? हार्दिक पांड्याने उत्तर देत केली स्वत:ची पाठराखणImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 21, 2026 | 6:42 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पहिल्याच सामन्यात विजय मिळवून 14 वर्षांचा पराभवाचा पायंडा मोडून काढला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. पण सलग चार पराभवानंतर या आनंदावर विरजन पडलं. त्यात मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंचा फॉर्म हा चिंतेचा विषय होता. खासकरून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकही विकेट न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. सलग पाच सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या सहाव्या सामन्यात त्याला यश मिळालं. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या हातात पहिलं षटक सोपवलं होतं. पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने साई सुदर्शनची विकेट काढली. या विकेटसह त्याने पाच सामन्यातील विकेट दुष्काळ संपुष्टात आणला. पहिलं षटक सोपल्याने फायदा झाला असं क्रिकेटप्रेमींचं म्हणणं होतं. पण हार्दिक पांड्याने आपल्या निर्णयाची पाठराखण करत पहिलं षटक का देत हे सांगितलं.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘ही खूपच रंजक गोष्ट आहे. मी पाहतो की बरेच लोक विचारतात की जस्सीला सुरुवातीला गोलंदाजी का दिली जात नाही, पण त्याने 140 हून अधिक सामन्यांमध्ये फक्त 7 किंवा 8 वेळाच पहिले षटक टाकले आहे. त्यामुळे ही हार्दिक पांड्याची समस्या नाही, तर ही सर्वांचीच समस्या आहे. कारण बुमराह इतका खास आहे की तुम्हाला त्याला नंतरच्या षटकांमध्ये खेळवायचे असते.’ आता पुढच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या हाती पहिलं षटक सोपवणार की नाही हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

आयपीएल स्पर्धेतील दुसऱ्या विजयानंतर मुंबई इंडियन्सने सातव्या स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघ शेवटच्या स्थानावर होता. मात्र आता चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना मागे टाकत सातवं स्थान गाठलं आहे. मुंबई इंडियन्सचे 8 सामने शिल्लक आहेत आणि प्लेऑफमध्ये जागा मिळावायची असेल तर 8 पैकी 6 सामने जिंकणं भाग आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. हा सामना 23 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सशी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक