AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतापला.. रागवला.. आणि ओरडला! तिलक वर्माने सांगितलं हार्दिक पांड्याने काय केलं ते

आयपीएल 2026 स्पर्धेत सलग चार पराभवानंतर मुंबई इंडियन्सने विजयाची चव चाखली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईने या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. तिलक वर्माने सांगितलं नेमकं काय घडलं ते...

संतापला.. रागवला.. आणि ओरडला! तिलक वर्माने सांगितलं हार्दिक पांड्याने काय केलं ते
संतापला.. रागवला.. आणि ओरडला! तिलक वर्माने सांगितलं हार्दिक पांड्याने काय केलं तेImage Credit source: PTI
| Updated on: Apr 21, 2026 | 5:58 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून विजयी सुरूवात केली. पण त्यानंतर विजयाची गाडी रूळावरून घसरली. एका पाठोपाठ एक चार पराभव सहन करावे लागले. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले होते. पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने जोरदार पुनरामगन केलं. या सामन्यात तिलक वर्माची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने 45 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. पण त्याने या आक्रमक खेळीपूर्वी खूपच संथ केली होती. त्याने 22 चेंडूत 19 धावा केल्या होत्या. पण कर्णधार हार्दिक पांड्याच्या संतापानंतर त्याने गिअर बदलला आणि आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 23 चेंडूत 82 धावा ठोकला. सामन्यानंतर तिलक वर्माने हार्दिक पांड्या काय म्हणाला याबाबत सर्वकाही सांगून टाकलं.

जिओहॉटस्टारच्या गुगल सर्च एआय मोड मॅच सेंटर लाईव्हमध्ये तिलक वर्मा म्हणाला की, ‘सर्वांना माहिती आहे की हार्दिक पांड्या उत्साही आहे आणि तो माझा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला की तू हे करू शकतोस, तू हे करशील. पण मला एकाग्र व्हायचं असल्याने मी त्याला शांत राहण्यास सांगितलं. मी बाकी सर्व सांभाळून घेईन असं आश्वासन दिलं.’ तिलक वर्मा पुढे म्हणाला की, ‘हे संघासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. गेल्या चार-पाच सामन्यांमध्ये एक गोष्ट माझ्या मनात सतत होती की, मी क्रीजवर जास्त वेळ घालवला नव्हता आणि जास्त चेंडूंचा सामना केला नव्हता. त्यामुळे, खेळपट्टीवर थोडा वेळ घालवून संघाच्या परिस्थितीशी जुळवून घेणे हे माझे ध्येय होते.’

तिलक वर्मा पुढे म्हणाला की, आम्ही खूप दूरचा विचार न करता एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक सामना जवळपास बाद फेरीसारखाच असतो. आम्ही काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. खेळपट्टी आणि फलंदाजीच्या क्रमाबाबत तिलक वर्मा म्हणाला की, मुंबई इंडियन्स अहमदाबादला येतो तेव्हा ते सहसा आम्हाला काळ्या मातीची खेळपट्टी देतात. जी थोडी संथ असते. खेळपट्टी संथ आणि खाली झुकलेली होती, त्यामुळे आम्हाला तोल सांभाळून सरळ फटका मारण्याचा प्रयत्न करावा लागला. दरम्यान, मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. पण संघाला माझी जिथे गरज असेल तिथे फलंदाजी करायला मी आनंदी आहे.

Follow Us
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं.