AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ऋतुराजसोबत फलंदाजी करताना विराट का घाबरला? एक क्षणात जीवाची धाकधूक

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना रायपूरमध्ये सुरु आहे. या सामन्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतकी खेळी करत टीम इंडियाला 350 धावांच्या पार जाण्यास मदत केली. पण एक वेळ अशी आली की विराट ऋतुराजसोबत फलंदाजी करताना घाबरला. का ते जाणून घ्या.

Video: ऋतुराजसोबत फलंदाजी करताना विराट का घाबरला? एक क्षणात जीवाची धाकधूक
ऋतुराजसोबत फलंदाजी करताना विराट का घाबरला? एक क्षणात जीवाची धाकधूक Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Dec 03, 2025 | 6:35 PM
Share

दुसर्‍या वनडे सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. सलग दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 350 पार धावा केल्या आहे. तर विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं. त्याला ऋतुराज गायकवाडची साथ मिळाली आणि त्यानेही शतकी खेळी केली. ऋतुराज गायकवाडने 105 आणि विराट कोहलीने 102 धावा केल्या. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी झाली. पण या भागीदारी दरम्यान एक क्षण असा आला की विराट कोहलीच्या काळजाचा ठोका चुकला. विराट आणि ऋतुराज ही जोडी मैदानात जमली होती. दोघंही जुना चेंडू होण्याआधीच संघासाठी झटपट धावा करत होते. कारण एकदा चेंडू जुना झाला की रिव्हर्स स्विंग होईल आणि फलंदाजीला कठीण जाईल. अशा स्थितीत विराट कोहली ऋतुराजसोबत धावा करण्यासाठी धडपड करत होता. यावेळी एक क्षण असा आला की मोठी दुर्घटना होता होता टळली.

विराट कोहलीने फटकेबाजी करताना एक शॉट असा मारला की त्या ऋतुराज गंभीर थोडक्यात वाचला. त्याने इतक्या जोरात फटका मारला होता की हा चेंडू ऋतुराजला लागला असता तर त्याला तंबूतच परतावं लागलं असतं. फटका मारल्यानंतर विराटला चेंडू त्याच्या जवळून जाईपर्यंत हीच भीती वाटत असावी. 34व्या षटकात विराट कोहलीने पुढे समोर जोरात फटका मारला. हा चेंडू काही क्षणात ऋतुराजच्या अगदी जवळून गेला. ऋतुराजने कसं बसं स्वत:ला वाचवलं. खाली पडला आणि चेंडू बाजूने निघून गेला. विराट या फटक्यानंतर घाबरलेला दिसला आणि ऋतुराजजवळ जाऊन त्याची विचारपूस केली. याच सामन्यात कोहलीने आणखी एक समोरून शॉट मारला होता. तो ऋतुराजच्या डोक्यावरून गेला होता.

विराट कोहलीसाठी आता शतक काही नवीन नाही असंच क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. विराटने वनडेतील 54वं शतक ठोकलं. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 84वी शतकी खेळी केली. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडने वनडे क्रिकेटमधील पहिलं शतक ठोकलं. त्याने 77 चेंडूत हे शतक ठोकलं. खरं तर ऋतुराज गायकवाड ओपनिंगला फलंदाजी करतो. पण चौथ्या क्रमांकावर येत त्याने शतकी खेळी केली. याचं श्रेय त्याने विराट कोहलीला दिलं. विराटने मदत केल्याचं ऋतुराजने सांगितलं.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप