AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ऋतुराजसोबत फलंदाजी करताना विराट का घाबरला? एक क्षणात जीवाची धाकधूक

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना रायपूरमध्ये सुरु आहे. या सामन्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतकी खेळी करत टीम इंडियाला 350 धावांच्या पार जाण्यास मदत केली. पण एक वेळ अशी आली की विराट ऋतुराजसोबत फलंदाजी करताना घाबरला. का ते जाणून घ्या.

Video: ऋतुराजसोबत फलंदाजी करताना विराट का घाबरला? एक क्षणात जीवाची धाकधूक
ऋतुराजसोबत फलंदाजी करताना विराट का घाबरला? एक क्षणात जीवाची धाकधूक Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Dec 03, 2025 | 6:35 PM
Share

दुसर्‍या वनडे सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. सलग दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 350 पार धावा केल्या आहे. तर विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं. त्याला ऋतुराज गायकवाडची साथ मिळाली आणि त्यानेही शतकी खेळी केली. ऋतुराज गायकवाडने 105 आणि विराट कोहलीने 102 धावा केल्या. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी झाली. पण या भागीदारी दरम्यान एक क्षण असा आला की विराट कोहलीच्या काळजाचा ठोका चुकला. विराट आणि ऋतुराज ही जोडी मैदानात जमली होती. दोघंही जुना चेंडू होण्याआधीच संघासाठी झटपट धावा करत होते. कारण एकदा चेंडू जुना झाला की रिव्हर्स स्विंग होईल आणि फलंदाजीला कठीण जाईल. अशा स्थितीत विराट कोहली ऋतुराजसोबत धावा करण्यासाठी धडपड करत होता. यावेळी एक क्षण असा आला की मोठी दुर्घटना होता होता टळली.

विराट कोहलीने फटकेबाजी करताना एक शॉट असा मारला की त्या ऋतुराज गंभीर थोडक्यात वाचला. त्याने इतक्या जोरात फटका मारला होता की हा चेंडू ऋतुराजला लागला असता तर त्याला तंबूतच परतावं लागलं असतं. फटका मारल्यानंतर विराटला चेंडू त्याच्या जवळून जाईपर्यंत हीच भीती वाटत असावी. 34व्या षटकात विराट कोहलीने पुढे समोर जोरात फटका मारला. हा चेंडू काही क्षणात ऋतुराजच्या अगदी जवळून गेला. ऋतुराजने कसं बसं स्वत:ला वाचवलं. खाली पडला आणि चेंडू बाजूने निघून गेला. विराट या फटक्यानंतर घाबरलेला दिसला आणि ऋतुराजजवळ जाऊन त्याची विचारपूस केली. याच सामन्यात कोहलीने आणखी एक समोरून शॉट मारला होता. तो ऋतुराजच्या डोक्यावरून गेला होता.

विराट कोहलीसाठी आता शतक काही नवीन नाही असंच क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. विराटने वनडेतील 54वं शतक ठोकलं. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 84वी शतकी खेळी केली. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडने वनडे क्रिकेटमधील पहिलं शतक ठोकलं. त्याने 77 चेंडूत हे शतक ठोकलं. खरं तर ऋतुराज गायकवाड ओपनिंगला फलंदाजी करतो. पण चौथ्या क्रमांकावर येत त्याने शतकी खेळी केली. याचं श्रेय त्याने विराट कोहलीला दिलं. विराटने मदत केल्याचं ऋतुराजने सांगितलं.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?