AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेआधी विराटने धरला वेगळा मार्ग!

west indies vs team india 3rd odi | टीम इंडिया विरुद्ध इंडिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा 1 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे.

Virat Kohli | विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेआधी विराटने धरला वेगळा मार्ग!
| Updated on: Jul 31, 2023 | 6:54 PM
Share

त्रिनिदाद | टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने खेळवण्यात आले आहेत. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी पोर्ट ऑफ स्पेनमधील क्विन्स पार्क ओव्हल इथे खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने विजयी सलामी दिली होती. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विंडिजवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. तर दुसरा सामना जिंकून विंडिजने बरोबरी साधली होती. त्यामुळे तिसरा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. या सर्व गडबडीदरम्यान टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी आली आहे.

टीम इंडियाची विंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिकेत उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. विंडिजने टीम इंडियाला 2006 मध्ये एकदिवसीय मालिकेत 3-1 ने पराभूत केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाने सातत्याने विंडिजवर वनडे सीरिजमध्ये विजय मिळवलाय. मात्र आता मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे टीम इंडियावर तब्बल 17 वर्षांनी वनडे सीरिज गमावण्याची टांगती तलवार आहे.

टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचं आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली हा टीम इंडियासोबत तिसऱ्या मॅचसाठी प्रवास केलं नसल्याचं समजतंय. त्यामुळे विराटला तिसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झालीय.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे हार्दिक पंड्या याला कर्णधारपदाची सूत्रं देण्यात आली. तर संजू सॅमसन याचा संघात समावेश करण्यात आला. मात्र इथे हा प्रयोग फसला. विंडिजने टीम इंडियावर विजय मिळवला. त्यामुळे आता तिसरी मॅच ही निर्णायक स्थितीत आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली सोबत नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर विराट कोहली तिसऱ्या सामन्यात सहभागी होणार नसेल, तर टीम इंडियासाठी निश्चितच चिंताजनक बाब असेल.

दरम्यान या एकदिवसीय मालिकेनंतर विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका पार पडणार आहे. या मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 13 ऑगस्ट रोजी 5 वी आणि अंतिम मॅच खेळवण्यात येईल.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.