AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही? मुंबईच्या निवड समितीने दिले असे अपडेट

रोहित शर्मा आणि विराट कोहली फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी बीसीसीआने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता या बातमीत ट्विस्ट आला आहे.

रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही? मुंबईच्या निवड समितीने दिले असे अपडेट
रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही? मुंबईच्या निवड समितीने दिले असे अपडेटImage Credit source: Ayush Kumar/Getty Images
| Updated on: Nov 13, 2025 | 4:34 PM
Share

वनडे वर्ल्डकप 2027 च्या दृष्टीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची मोर्चेबांधणी सुरु आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेला अजूनही दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी दोन्ही दिग्गज खेळाडू वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. पण या मालिकांचं प्रमाण मर्यादीत असल्याने निवड समितीला त्यांची निवड करताना विचार करावा लागत आहे. असं असताना बीसीसीआयने दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्याचे आदेश दिले आहेत. बीसीसीआयने स्पष्ट केलं की, जर त्यांना वनडे फॉर्मेटसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांनी देशांतर्गत स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावे. त्यानंतर रोहित शर्माने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची तयारी दर्शवल्याचं वृत्त आलं. पण या बातमीत आता ट्विस्ट आला आहे. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केलं की, रोहित शर्माकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

एमसीएचे मुख्य निवडकर्ते संजय पाटील यांनी सांगितलं की, रोहितने अद्याप कोणताही संपर्क साधलेला नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार संजय पाटील म्हणाले की, “मला रोहित शर्माकडून अद्याप कोणताही संपर्क मिळालेला नाही. जर तो मुंबईकडून खेळला तर ते आमच्यासाठी चांगले असेल. ते तरुणांसाठीही चांगले असेल. बीसीसीआय, अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांनी खूप चांगले पाऊल उचलले आहे.” बीसीसीआयने रोहित आणि विराटला वनडे मालिकेपूर्वी फिट राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा 24 डिसेंबर ते 11 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची भारत दक्षिण अफ्रिका वनडे मालिकेसाठी संघात निवड होईल यात काही शंका नाही. ही वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून तीन सामने असणार आहेत. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 26 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र या मालिकेत खेळणार की नाही हे देखील स्पष्ट नाही. दरम्यान, बीसीसीआय आणि सध्याचे संघ व्यवस्थापन त्यांच्या वाढत्या वयामुळे आणि अलिकडच्या खराब कामगिरीमुळे चिंतेत आहेत. पण रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सर्वाधिक धावा करून निवड समितीला पुन्हा संभ्रमात टाकलं आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक