T20 Mens World Cup 2021 | भारताला धक्का बसण्याची चिन्हं, T20 वर्ल्ड कप दुसऱ्या देशात खेळवणार?

टी -20 वर्ल्ड कप 2021 भारतात नियोजित करण्यात आला आहे.

T20 Mens World Cup 2021 | भारताला धक्का बसण्याची चिन्हं, T20 वर्ल्ड कप दुसऱ्या देशात खेळवणार?
icc t 20 world cup
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 1:36 PM

इस्लामाबाद : यंदाच्या वर्षी आयसीसी टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप (T 20 World Cup) स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे (Coronavirus) ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. यामुळे ही स्पर्धा 2021 मध्ये खेळण्यात येणार आहे. आयसीसीच्या या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. म्हणजेच या स्पर्धेचं आयोजन बीसीसीआय करणार आहे. मात्र या स्पर्धेचं यजमानपद भारताऐवजी यूएईला (UAE) मिळू शकतं, असं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricekt Board) सीईओ वसीम खान (Wasim Khan) यांनी केलं आहे. icc t 20 world cup 2021 india could be moved to uae, says pakistan ceo wasim khan

वसीम खान काय म्हणाले?

“2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेबद्दल अनिश्चितता आहे. या स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये केलं जाऊ शकतं, असं ही होऊ शकतं. इंग्लंड क्रिकेट संघ 2021 च्या सुरुवातीला इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यानंतर आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजनही केलं जाणार आहे. यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाचं सर्व चित्र स्पष्ट होईल”, असं वसीम खानने म्हटलं. खान एका युट्यूब चॅनेलशी बोलत होते. यादरम्यान त्यांनी याबाबत हे विधान केलं.

2022 च्या वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला

आयसीसीने कोरोना व्हायरसमुळे या वर्षी होणारी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित केली. यामुळे आयसीसीने 2021 च्या वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भारताला तर 2022 च्या स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला दिलं आहे. तसेच 2023 मध्ये 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजनही भारतात करण्यात येणार आहे.

पुढील म्हणजेच 2021 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा भारतात खेळण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिझा आवश्यक आहे. या व्हिझाबाबत आयसीसी आणि बीसीसीआय यांच्याकडून लेखी आश्वासन मिळण्याची वाट पाहत आहोत, असंही खानने म्हटलं.

जून महिन्यात आशिया चषक

“मागील आठवड्यात आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक पार पडली. पुढील आशिया कप स्पर्धेचं आयोजन श्रीलंकेत केलं जाणार असल्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला. ही स्पर्धा जून महिन्यात खेळण्यात येणार आहे. तसेच 2022 च्या आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाचं मान पाकिस्तानला मिळणार आहे”, असंही खानने नमूद केलं.

संबंधित बातम्या :

T 20 Mens World Cup 2021 | T 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळणं हे सन्मानजनक : सौरव गांगुली

PHOTO | अतिशहाणपणा नडला, कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटवर कारवाई

icc t 20 world cup 2021 india could be moved to uae, says pakistan ceo wasim khan

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.