AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…म्हणून के. एल. राहुलला संघात ठेवलंय’, अखेर रोहित शर्माने केला खुलासा

गेल्या अनेक दिवसांपासून राहुलला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही कसोटीमध्ये राहुल अपयशी ठरला. यावरून त्याला धारेवर धरलं जात असताना कर्णधार रोहित शर्माने राहुलचं समर्थन केलं आहे. इतकंच नाहीतर संघामध्ये राहुलला का स्थान दिलं आहे याबाबतही खुलासा केला आहे.

'...म्हणून के. एल. राहुलला संघात ठेवलंय', अखेर रोहित शर्माने केला खुलासा
| Updated on: Feb 19, 2023 | 11:40 PM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मालिकेमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. दोन्ही कसोटीमध्ये आर. आश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या दमदार बॉलिंगच्या प्रदर्शनाच्या जोरावर कांगारूंवर दोन्ही सामन्यात सहज विजय मिळवता आला. भारतासाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे ती म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर के. एल. राहुल. कारण गेल्या अनेक दिवसांपासून राहुलला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही कसोटीमध्ये राहुल अपयशी ठरला. यावरून त्याला धारेवर धरलं जात असताना कर्णधार रोहित शर्माने राहुलचं समर्थन केलं आहे. इतकंच नाहीतर संघामध्ये राहुलला का स्थान दिलं आहे याबाबतही खुलासा केला आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा-

गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या फॉर्मवरून खूप चर्चा होताना दिसत आहे. पण टीम मॅनेजमेंट म्हणून राहुलच्या फॉर्मला पाहता त्याच्यातील क्षमतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जर एखाद्या खेळाडूकडे क्षमता असेल तर त्याला जास्तीत जास्त संधी दिल्या जात असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या पीचवर खेळता तेव्हा तुम्हाला धावा करण्यासाठी मार्ग काढावा लागतो. प्रत्येक फलंदाजाची स्पिनर्सविरूद्द खेळण्याची पद्धत वेगळी असते. कोणता खेळाडू कसा धावा करतो आमच्यासाठी महत्त्वाचं नसून सर्वजण एकत्र येऊन जास्तीत जास्त धावा कशा काढता येतील हे महत्त्वाचं असल्याचंही रोहितने सांगितलं.

कांगारूंविरूद्धच्या उर्वरित 2 कसोटी सामन्यांमध्ये निवड समितीने विश्वास ठेवत त्याला स्थान दिलं आहे. राहुलच्या संघात असण्यामुळे नेटकऱ्यांनी निवड समितीच्या या निर्णयावर ताशेरे ओढले. कारण राहुलच्या जागी दुसऱ्या युवा खेळाडूला संधी दिली तर ते भारताच्या फायद्याचं ठरेल अशा अनेक प्रतिक्रिया बीसीसीआयने संघाची घोषणा केल्यावर आल्या. सामना संपल्यावर काही तासांमध्येच बीसीसीआयने वनडे आणि कसोटी संघांची घोषणा केली होती.

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर चौथी कसोटी, 9-13 मार्च,

वनडे सीरिज पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

उर्वरित 2 कसोटींसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.