2011 नंतर विश्वचषकात भारताचा फक्त दोन वेळा पराभव

विश्वचषक सामन्यात भारताने सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करुन भारताने आपला विजयरथ कायम राखला. या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

2011 नंतर विश्वचषकात भारताचा फक्त दोन वेळा पराभव
Follow us
| Updated on: Jun 23, 2019 | 8:39 AM

लंडन : विश्वचषक सामन्यात भारताने सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करुन भारताने आपला विजयरथ कायम राखला. या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. मात्र अफगाणिस्ताननेही भारताला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करायला लावला. हा विजय भारतासाठी खास ठरला आहे. कारण काल (23 जून) झालेल्या सामन्यात भारताने विश्वचषकातील 50 वा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 2011 नंतर विश्वचषक सामन्यात भारताचा फक्त दोनवेळा पराभव झाला आहे.

भारताने विश्वचषक सामन्यात 50 वा विजय मिळवल्यानंतर चाहत्यांकडूनही खेळाडूंचे कौतुक करण्यात येत आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भारतापेक्षा पुढे आहेत. या दोन्ही देशांनीही विश्वचषक सामन्यात आतापर्यंत 50 पेक्षा अधिक वेळा विजय मिळवला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 67 आणि न्यूजीलंडने 52 सामन्यात विजय मिळवला आहे.

आतापर्यंत विश्वचषकात झालेल्या सामन्यात भारताने फक्त दोन सामन्यात पराभव पत्कारला होता. यामध्ये 2011 ला साऊथ आफ्रिका आणि 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारत विरुद्ध अफगाणिस्थानमध्ये झालेल्या थरारक सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने चार फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि हॅट्ट्रिकही केली. गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवणे सोपं झाले.

संबधित बातम्या : 

भारत हा जगातला सर्वोकृष्ट संघ, अफगाणिस्तानच्या कर्णधाराकडून कौतुक

थरारक सामन्यात भारताचा विजय, मोहम्मद शमीची शानदार हॅट्ट्रिक

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.