AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2011 नंतर विश्वचषकात भारताचा फक्त दोन वेळा पराभव

विश्वचषक सामन्यात भारताने सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करुन भारताने आपला विजयरथ कायम राखला. या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

2011 नंतर विश्वचषकात भारताचा फक्त दोन वेळा पराभव
| Edited By: | Updated on: Jun 23, 2019 | 8:39 AM
Share

लंडन : विश्वचषक सामन्यात भारताने सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करुन भारताने आपला विजयरथ कायम राखला. या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. मात्र अफगाणिस्ताननेही भारताला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करायला लावला. हा विजय भारतासाठी खास ठरला आहे. कारण काल (23 जून) झालेल्या सामन्यात भारताने विश्वचषकातील 50 वा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 2011 नंतर विश्वचषक सामन्यात भारताचा फक्त दोनवेळा पराभव झाला आहे.

भारताने विश्वचषक सामन्यात 50 वा विजय मिळवल्यानंतर चाहत्यांकडूनही खेळाडूंचे कौतुक करण्यात येत आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भारतापेक्षा पुढे आहेत. या दोन्ही देशांनीही विश्वचषक सामन्यात आतापर्यंत 50 पेक्षा अधिक वेळा विजय मिळवला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 67 आणि न्यूजीलंडने 52 सामन्यात विजय मिळवला आहे.

आतापर्यंत विश्वचषकात झालेल्या सामन्यात भारताने फक्त दोन सामन्यात पराभव पत्कारला होता. यामध्ये 2011 ला साऊथ आफ्रिका आणि 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारत विरुद्ध अफगाणिस्थानमध्ये झालेल्या थरारक सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने चार फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि हॅट्ट्रिकही केली. गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवणे सोपं झाले.

संबधित बातम्या : 

भारत हा जगातला सर्वोकृष्ट संघ, अफगाणिस्तानच्या कर्णधाराकडून कौतुक

थरारक सामन्यात भारताचा विजय, मोहम्मद शमीची शानदार हॅट्ट्रिक

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.