AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Vs Pakistan:एशिया हॉकी कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅच ड्रॉ, शेवटच्या 70 सेकंदात पाकिस्तान टीमने केला गोल, भारताकडून कार्ती सेल्वमचा एकमेव गोल

पाकिस्तानच्या अब्दुल राणाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत, ही मॅच भारताच्या हातात जाऊ दिली नाही. टीम इंडियाकडून एकमात्र गोल कार्ती सेल्वम याने नोंदवला.

India Vs Pakistan:एशिया हॉकी कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅच ड्रॉ, शेवटच्या 70 सेकंदात पाकिस्तान टीमने केला गोल, भारताकडून कार्ती सेल्वमचा एकमेव गोल
India VS Pakistan Asia hockey cupImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 7:51 PM
Share

एशिया कप हॉकी (Asia Cup Hockey tournament) टुर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या (India Vs Pakistan)मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत थरार रंगला. शेवटच्या 70 सेकंदात पाकिस्तानने (Pakistan goal)केलेल्या गोलमुळे ही मॅच 1-1 अशी बरोबरीने संपली. पाकिस्तानच्या अब्दुल राणाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत, ही मॅच भारताच्या हातात जाऊ दिली नाही. टीम इंडियाकडून एकमात्र गोल कार्ती सेल्वम याने नोंदवला. पहिला हाफमध्ये भारतीय टीमने दोन पेनल्टी कॉर्नरची संधी गमावली. मात्र तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत कार्तीने 9 व्या मिनिटांत गोल करत भारताला 1-0 अशी बढत मिळवून दिली होती. आता टीम इंडियाचा पुढील मुकाबला 24 मे रोजी जपान आणि 26 मे रोजी इंडोनेशियाशी होणार आहे.

यापूर्वी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने दिली होती पाकिस्तानला मात

यापूर्वी 21 डिसेंबर 2021 रोजी खेळवण्यात आलेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा 4-3 ने पराभव केला होता. बीरेंद्र लाकडा याच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्सशिपच्या या वर्षातील स्पर्धेची सुरुवात विजयाने करु इच्छित होती. मात्र असे होऊ शकले नाही. शेवटच्या 70 सेकंदांनी भारतीय टीमचा घात केला. सध्या भारतीय हॉकी टीमच ही टूर्नामेंट जिंकेल यासाठी फेव्हरेट मानण्यात येत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांची टूर्नामेंट जिंकण्यात बरोबरी

ही टुर्नामेंट आत्तापर्यंत जिंकण्यात भारत आणि पाकिस्तान यांची बरोबरी आहे. दोन्ही टीमच्या नावावर तीनतीन विजयांची नोंद आहे. भारताने 2003,2007 आणि 2017 साली ही टुर्नामेंट जिंकलेली आहे. तर 1982, 1985, 1994, 2013 साली फायनलमध्ये पराभव स्वीकारला आहे. आजची मॅच ही भारत आणि पाकिस्तानमधील १७८ वी मॅच होती.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.