AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूझीलंडचा कर्णधार म्हणतो, ‘भारताची बोलिंग जगात एक नंबर, विराट माझा मित्र पण…’

भारताची बोलिंग जगात सर्वोत्तम आहे. सध्या भारतीय गोलंदाज भलतेच फॉर्मात आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी करुन संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यांची तारीफ करायलाच हवी, असं केन म्हणाला. | India vs New Zealand kane Williamson

न्यूझीलंडचा कर्णधार म्हणतो, 'भारताची बोलिंग जगात एक नंबर, विराट माझा मित्र पण...'
केन विल्यमसन आणि विराट कोहली
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 7:10 AM
Share

मुंबई : टीम इंडियाचे (Team India) सगळे खेळाडू इंग्लंडमध्ये (India Tour of England) पोहोचले आहेत. 2 जून रोजी मध्यरात्री भारतीय संघांच्या खेळाडूंनी इंग्लंडसाठी उड्डाण घेतलं. 3 जून रोजी संघ लंडनमध्ये पोहोचला. तिथून साऊथहॅम्प्टन… सध्या सगळे खेळाडू क्वारंटाईन पिरियड संपवून न्यूझीलंडला अंतिम सामन्यात धूळ चारण्याची रणनिती आखण्यात व्यस्त आहेत. लवकरच सराव सत्र सुरु होईल. एकंदरितच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याची जशी उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे तशी ती खेळाडूंना देखील आहे. अशातच न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) मोठं वक्तव्य केलेलं आहे. त्याने भारतीय गोलंदाजांची तारीफ करताना सध्या भारतीय गोलंदाज जगात एक नंबर आहेत, असं म्हटलं आहे. (India vs New Zealand kane Williamson On World Test Championship Final 2021)

भारतीय बोलर जगात सर्वोत्तम

भारताची बोलिंग जगात सर्वोत्तम आहे. सध्या भारतीय गोलंदाज भलतेच फॉर्मात आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी करुन संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यांची तारीफ करायलाच हवी. दुसरीकडे अंतिम सामन्याच्या नाणेफेकीसाठी विराट कोहलीसोबत मैदानावर जाण्याचा खास अनुभव असेल, असं केन म्हणाला.

कसोटी रँकिकमध्ये भारत एक नंबर

भारताकडे उत्तम आणि जागतिक किर्तीचे खेळाडू आहेत. परिस्थिती सोबत नसताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत जाऊन हरवलं, ही तारीफ करण्यासारखी गोष्ट आहे. भारताकडे वेगवान आणि फिरकी याचा अनोखा मिलाफ आहे. प्रतिस्पर्धी संघाला जशास तशी टक्कर देण्यास भारतीय संघ मजबूत आहे. सध्या कसोटी रँकिकमध्ये भारत एक नंबरवर आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत अंतिम सामन्यात दोन हात करायला मजा येईल, असंही केन म्हणाला.

विराट कोहलीबाबत बोलताना केन काय म्हणाला?

विराट कोहलीबाबत बोलताना केन म्हणाला, अंडर 19 पासून विराट आणि मी एकमेकांना खेळताना पाहतोय. तेव्हापासून आम्ही चांगले मित्र आहोत. मैदानाच्या आतमध्ये आम्ही दोघे कट्टर प्रतिस्पर्धी असतो पण मैदानाबाहेर विराट माझा खूप चांगला मित्र आहे, असं केन म्हणाला.

सामना टाय झाल्यास किंवा अनिर्णित झाल्यास विजेता कोण?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघात इंग्लंडमध्ये 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान खेळला जाईल. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघ संयुक्तरित्या विजेते ठरतील. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला आहे. सामन्यादरम्यान विविध कारणांमुळे व्यत्यय येतो. त्यामुळे काही वेळ खेळ होत नाही. कधी पावसामुळे तसेच विविध कारणांमुळे काही वेळ सामना थांबवावा लागतो. साधारणपणे एक कसोटी खेळवण्यासाठी 30 तासांचा खेळ अपेक्षित असतो. तर हाच वेळ दिवसाकाठी 6 तास इतका असतो. या 6 तासांमध्ये चहापान, लंच आणि ड्रींक्स ब्रेकचा समावेश नसतो.

(India vs New Zealand kane Williamson On World Test Championship Final 2021)

हे ही वाचा :

भारताचा श्रीलंका दौरा, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा?

IPL 2021 Schedule : आयपीएलच्या नव्या तारखा ठरल्या, दसऱ्याला फायनल!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.