AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकविरुद्ध खेळायचं की नाही, निर्णय मोदी सरकार घेणार

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीआय) वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही, याबाबतचा फैसला सरकारकडे सोपवला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचं काम पाहणारी प्रशासक समिती (CoA) चे प्रमुख विनोद राय यांच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर विनोद राय यांनी याबबतची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही याबाबत सरकारशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं […]

पाकविरुद्ध खेळायचं की नाही, निर्णय मोदी सरकार घेणार
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीआय) वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही, याबाबतचा फैसला सरकारकडे सोपवला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचं काम पाहणारी प्रशासक समिती (CoA) चे प्रमुख विनोद राय यांच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर विनोद राय यांनी याबबतची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही याबाबत सरकारशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

सध्या विश्वचषकासाठी तीन महिन्यांचा वेळ आहे. त्यामुळे सरकारशी चर्चा करुन पाकिस्तानविरुद्ध खेळायचं की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं विनोद राय यांनी सांगितलं.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडावे अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच क्रिकेट विश्वचषकातही भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशीही मागणी पुढे आली. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना 16 जूनला मँचेस्टर इथं होणार आहे. मात्र हा सामना खेळू नये, अशी मागणी होत आहे.  त्यामुळे बीसीसीआयच्या प्रशासक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज बैठक घेतली.

सीओए प्रमुख विनोद राय यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली.”सध्या आमची सरकारशी चर्चा सुरु आहे. 16 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही आयसीसीला दोन चिंता सांगू. पहिलं तर आमच्या खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा आणि दुसरा म्हणजे जो देश दहशतवादाला चालना देत आहे त्या देशाशी क्रिकेटचे संबंध तोडावे”, असं विनोद राय यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

 शोएब अख्तर म्हणतो, ‘पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण…’ 

CoA Meeting LIVE : भारत-पाक मॅच होणार की नाही? नागपूरच्या थोडगेंची महत्त्वाची भूमिका  

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याला नागपुरात विरोध, मैदान खोदण्याचा इशारा 

पाकिस्तानविरुद्ध न खेळण्यापेक्षा, खेळून हरवा: सुनील गावसकर  

पुलवामा हल्ल्यानंतर राजनाथ सिहांची EXCLUSIVE मुलाखत  

‘पुलवामाप्रमाणे आत्मघाती हल्ला करु’, जैशनंतर आता हिजबुलची धमकी 

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.