AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, मालिकेत 3-1 ने आघाडी

मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास थोडा उशीर झाला. पण येथे वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

India vs West Indies : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, मालिकेत 3-1 ने आघाडी
टीम इंडिया (फाईल फोटो)Image Credit source: Google
| Updated on: Aug 07, 2022 | 8:48 AM
Share

मुंबई : भारताने (India) चौथ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) 59 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली, फक्त एक सामना (Match) बाकी आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 धावा केल्या होत्या, नंतर फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा डाव गडगडला आणि अवघ्या 132 धावांवर सर्वबाद झाला.

वेस्ट इंडिजला 132 धावा करता आल्या

मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास थोडा उशीर झाला. पण येथे वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 191 धावा केल्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला 132 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजकडून रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांनी 24-24 धावा केल्या, तर उर्वरित फलंदाजी अपयशी ठरली. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, आवेश खान-अक्षर पटेल-रवी बिश्नोईने 2-2 बळी घेतले.

टीम इंडिया अशी फलंदाजी करत आहे

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 191 धावा केल्या होत्या. ऋषभ पंतने टीम इंडियासाठी 44 धावांची इनिंग खेळली, त्याने आपल्या इनिंगमध्ये 6 चौकार मारले. त्यांच्याशिवाय संजू सॅमसननेही अखेरीस ३० धावांची जलद खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी या सामन्यात भारताला वेगवान सुरुवात करून दिली. रोहित शर्माने अवघ्या 16 चेंडूत 33 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 14 चेंडूत 24 धावा केल्या.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.