AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, मालिकेत 3-1 ने आघाडी

मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास थोडा उशीर झाला. पण येथे वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

India vs West Indies : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, मालिकेत 3-1 ने आघाडी
टीम इंडिया (फाईल फोटो)Image Credit source: Google
| Updated on: Aug 07, 2022 | 8:48 AM
Share

मुंबई : भारताने (India) चौथ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) 59 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली, फक्त एक सामना (Match) बाकी आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 धावा केल्या होत्या, नंतर फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा डाव गडगडला आणि अवघ्या 132 धावांवर सर्वबाद झाला.

वेस्ट इंडिजला 132 धावा करता आल्या

मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास थोडा उशीर झाला. पण येथे वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 191 धावा केल्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला 132 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजकडून रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांनी 24-24 धावा केल्या, तर उर्वरित फलंदाजी अपयशी ठरली. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, आवेश खान-अक्षर पटेल-रवी बिश्नोईने 2-2 बळी घेतले.

टीम इंडिया अशी फलंदाजी करत आहे

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 191 धावा केल्या होत्या. ऋषभ पंतने टीम इंडियासाठी 44 धावांची इनिंग खेळली, त्याने आपल्या इनिंगमध्ये 6 चौकार मारले. त्यांच्याशिवाय संजू सॅमसननेही अखेरीस ३० धावांची जलद खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी या सामन्यात भारताला वेगवान सुरुवात करून दिली. रोहित शर्माने अवघ्या 16 चेंडूत 33 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 14 चेंडूत 24 धावा केल्या.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.