WTC फायनल खेळायचीय, भारतीय संघाला ICC चे कडक नियम पाळावेच लागतील!

भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्याअगोदर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने भारतीय संघासाठी कडक नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. (Indian team hard Quarantine period before World Test Championship Final 2021)

WTC फायनल खेळायचीय, भारतीय संघाला ICC चे कडक नियम पाळावेच लागतील!
WTC Final
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 8:14 AM

मुंबई : कसोटी क्रिकेटचा ‘वर्ल्ड कप’ मानला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2021) 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे खेळवला जाणार आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारताची गाठ न्यूझीलंडशी (India and New Zealand) पडत आहे. पण या बहुप्रतिक्षित सामन्याअगोदर तथा भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्याअगोदर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने भारतीय संघासाठी कडक नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या कडक नियम आणि अटींचं पालन करावं लागणार आहे. (Indian team hard Quarantine period before World Test Championship Final 2021)

भारतीय संघाला इंग्लंडमध्ये क्वारन्टाईन रहावं लागणार

न्यूझीलंडशी अंतिम सामन्यात दोन हात करण्याअगोदर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये क्वारन्टाईन रहावं लागणार आहे. आयसीसीने शनिवारी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. परंतु भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर किती दिवसांचा क्वारन्टाईन पिरिअड असणार आहे, याची माहिती तूर्तास तरी आयसीसीने दिलेली नाहीय. परंतु हे मात्र नक्की की 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणाऱ्या भारतीय संघाला पुढचे काहि दिवस हॉटेलमध्ये क्वारन्टाईन रहावं लागणार आहे.

भारताअगोदर न्यूझीलंडची टीम इंग्लंडमध्ये पोहोचली

भारतीय संघाअगोर न्यूझीलंडची टीम इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याअगोदर इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडला खेळायची आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ आधीच इंग्लंडला पोहोचलाय. न्यूझीलंड संघातील खेळाडूंचा त्यासाठी कसून सराव सुरु आहे.

आयसीसीच्या प्रेस रिलीजनुसार, भारतीय संघ इंग्लंडच्या विमानतळावर उतरल्यानंतर तिथून थेट हॅम्पशायर बाऊलमधील हॉटेलमध्ये पोहोचेल जिथं क्वारन्टाईनसंबंधी सगळी व्यवस्था केलेली आहे. क्वारन्टाईन करण्याआधी खेळाडूंच्या आरोग्यासंबंधी चौकशी केली जाईल.

न्यूझीलंड संघासाठी, ईसीबीने (इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड) तीन दिवस कठोर क्वारन्टाईन केलं आहे. आणि त्यानंतर खेळाडूंना सराव करण्यास परवानगी दिली जाईल.

WTC Final ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बडा मुकाबला पार पडणार आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

(Indian team hard Quarantine period before World Test Championship Final 2021)

हे ही वाचा :

तुझं आणि माहीचं नातं फक्त 2 शब्दात सांग, फॅन्सच्या प्रश्नावर विराटचं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!

Video : IPL मॅचेससाठी चहलची बायको युएईला जाण्यासाठी तयार, BCCI ने घोषणा करताच डान्सचा खास व्हिडीओ शेअर

एक पराभव आणि प्रशिक्षकाला डच्चू, नामांकित संघाने महान माजी खेळाडूला घरी पाठवलं!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.