AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली

मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. | IPL 2020 Former Australia Bowler Brett Lee On Jasprit Bumrah

IPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली
| Edited By: | Updated on: Sep 19, 2020 | 6:12 PM
Share

यूएई : आयपीएलच्या 13 व्या हंगामाला शनिवारी 19 सप्टेंबरपासून सुरुवात यूएईमध्ये सुरुवात होतेय. या 13 व्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. चेन्नईचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनी करणार आहे. तर मुंबईची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. वेगवान बोलर जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीत मुंबईचा स्टार बोलर लसिथ मलिंगाची कमी जाणावणार नाही, असं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट लीने एका कार्यक्रमात म्हटलंय. लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. ( Former Australia Bowler Brett Lee On Jasprit Bumrah )

ब्रेट ली काय म्हणाला ?

“जसप्रीत बुमराह नव्या आणि जुन्या अशा दोन्ही बॉलने विकेट घेऊ शकतो. बुमराहच्या या वैशिष्ट्यामुळे मुंबईला मलिंगाची कमी जाणवणार नाही, असं ब्रेट ली म्हणाला. मी बुमराहचा सुरुवातीपासून चाहता आहे. बुमराहची बोलिंगची शैली इतर गोलंदाजांपेक्षा हटके आहे. या हटके शैलीमुळेच बुमराहला बॉल दोन्ही बाजूने स्विंग करता येतो. बुमराह नव्या आणि जुन्या बॉलने नक्कीच चमकदार कामगिरी करुन विकेट मिळवून देईल. तसेच बुमराह अखेरच्या ओव्हरमध्ये कमी धावा देत मलिंगाची कमी जाणवू देणार नाही”, असं ब्रेट ली म्हणाला.

मलिंगा मुंबईच्या बोलिंगचा कणा होता. निर्णायक क्षणी मलिंगा विकेट मिळवून द्यायचा. मलिंगाने अनेकदा मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला आहे. तसेच मलिंगा अखेरच्या ओव्हरमध्ये नेहमीच कमी धावा देत विकेट घ्यायचा. मात्र त्याने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. मलिंगाच्या जागी न्यूझीलंडचा वेगवान बोलर ट्रेन्ट बोल्टला संधी देण्यात आली आहे.

यंदा चेन्नई विजेतेपद मिळवणार – ब्रेट ली

“महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात या वर्षी चेन्नई विजेतेपद पटकवू शकते, असं ब्रेट ली म्हणाला. चेन्नई टीम फार संतुलित आणि सर्वसर्मावेशक आहे. चेन्नईकडे वॉटसन, धोनी यासारखे मोठी खेळी आणि फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत. तसेच चेन्नईकडे रवींद्र जडेजा, पियूष चावला यासारखे चांगले फिरकीपटू आहेत. यूएईमध्ये फिरकीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. यासर्व कारणांमुळे चेन्नई विजेतेपद पटकावेल”, असं ब्रेट लीला वाटतं.

मुंबई-चेन्नई आमनेसामने

मुंबई आणि चेन्नई आतापर्यंत एकूण 28 वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. या 28 सामन्यांपैकी मुंबईने चेन्नईचा 17 सामन्यात पराभव केला आहे. तर चेन्नईला 11 सामन्यात यश आले आहे. मुंबई आणि चेन्नई आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघ आहेत. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. तर त्या खालोखाल चेन्नईही 3 वेळा विजेता राहिली आहे.

मुंबईची यूएईमधील कामगिरी निराशाजनक

मुंबई संघाची यूएईमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यूएईत 2014 मध्ये आयपीएलचे 20 साखळी सामने खेळले गेले होते. मुंबईने यूएईत 5 सामने खेळले. यासर्व सामन्यात मुंबईचा पराभव झाला होता. त्यामुळे आता मुंबई कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेटचाहत्याचं लक्ष असणार आहे. ( Former Australia Bowler Brett Lee On Jasprit Bumrah )

संबंधित बातम्या :

IPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज

IPL 2020 | सलामीच्या लढतीत धोनीच्या चेन्नईपेक्षा रोहितची मुंबई भारी, गौतम गंभीरला विश्वास

IPL 2020 : सलामीच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहित शर्माने उलगडलं रहस्य

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.