AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या मोबाईलचं सोनं होणार, ई-कचऱ्यापासून ऑलिम्पिक पदकं बनणार!

नवी दिल्ली : तुमचा मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेट खराब झालं असेल, तर त्याचं आता सोनं होणार आहे. कारण तुमची खराब झालेली वस्तू आता वाया जाणार नाही. ऑलिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंच्या गळ्यात अभिमानाने चमकणारी पदकं, आता ई-वेस्टपासून बनवली जाणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचं आयोजन जपानची राजधानी टोकियो इथे होणार आहे. […]

तुमच्या मोबाईलचं सोनं होणार, ई-कचऱ्यापासून ऑलिम्पिक पदकं बनणार!
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share

नवी दिल्ली : तुमचा मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेट खराब झालं असेल, तर त्याचं आता सोनं होणार आहे. कारण तुमची खराब झालेली वस्तू आता वाया जाणार नाही. ऑलिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंच्या गळ्यात अभिमानाने चमकणारी पदकं, आता ई-वेस्टपासून बनवली जाणार आहेत.

पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचं आयोजन जपानची राजधानी टोकियो इथे होणार आहे. टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे जपानने त्यापूर्वीच पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना देण्यात येणारी पदकं ही ई-कचऱ्यापासून तयार करणाऱ्यात येणार आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2020 खेळांमधील सर्व पदकं ही इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून मिळणाऱ्या धातूंपासून तयार करण्यात येणार आहेत. आयोजकांनी शुक्रवारी याची घोषणा केली. टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीने 2017 मध्ये नागरिकांकडून जुने स्मार्टफोन्स, लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक कचरा जमवण्याची योजना लाँच केली होती. या योजनेचा हेतू टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेतील पदकांसाठी धातू जमा करणे होता. जपानी व्यवसाय आणि उद्योगाच्या माध्यमातून या ई-कचऱ्याची पुननिर्मिती अर्थात रिसाकल करुन धातू एकत्र करण्यात आले आहेत.

याबाबत आयोजकांनी सांगितले की, “जितक्या प्रमाणात आम्ही धातू एकत्रित केला आहे, त्याने पदकं बनवण्याचे आमचे लक्ष पूर्ण होईल. ही संपूर्ण प्रक्रिया मार्चच्या अखेरीस पूर्ण होईल.”

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जपान महापालिकेच्या आधिकाऱ्यांनी 47 हजार 488 टन ई-कचरा जमा केला होता. यामध्ये नागरिकांनी वापरलेल्या 50 लाख मोबाईल्सचा समावेश होता.

ऑलिम्पिक पदकं बनवण्यासाठी पहिल्यांदाज ई-कचऱ्याचा वापर करण्यात येत आहे असं नाही. तर याआधीही रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकं बनवण्यासाठी वापरण्यात आलेली 30 टक्के चांदी आणि कांस्य ई-कचऱ्यातूनच मिळवण्यात आले होते.

VIDEO : 

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली