Champions Trophy 2025 आधी टीम इंडियात बंडखोरी होणार का? कोणाला द्यावा लागणार राजीनामा?

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आधी किंवा नंतर भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठं वादळ येऊ शकतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच याच संकेत मिळत आहेत. बीसीसीआयने खेळाडूंसाठी 10 कठोर नियम लागू केले आहेत. पुढच्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आहे.

Champions Trophy 2025 आधी टीम इंडियात बंडखोरी होणार का? कोणाला द्यावा लागणार राजीनामा?
टीम इंडियाImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 17, 2025 | 1:46 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु व्हायला आता फक्त चार आठवड्यांचा कालावधी उरला आहे. 19 फेब्रुवारीपासून टुर्नामेंट सुरु होईल. 20 फेब्रुवारीला टीम इंडिया पहिला सामना खेळणार आहे. पण या महत्त्वाच्या स्पर्धेआधी टीम इंडियात तीव्र स्वरुपाचे मतभेद आहेत. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये अनेक मुद्यांवरुन मतभेद आहेत. गौतम गंभीर यांच्या कठोर स्वभावामुळे टीममध्ये त्यांच्याविरोधात बंडखोरीची स्थिती उदभवू शकते. या सगळ्यामध्ये गौतम गंभीर आपल्या पदाचा राजीनामा देणार का? आठवर्षांपूर्वी भारतीय कोचसोबत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान असं झालं होतं.

टीमच्या खराब प्रदर्शनापेक्षाही संघात बंडखोरी हे गंभीर समोरच मोठ आव्हान बनू शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार गंभीरची काम करण्याची पद्धत अनेक खेळाडूंना पटलेली नाही. खासकरुन सिनियर खेळाडू हैराण आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हेड कोच आणि कॅप्टमनध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. इतकच नाही, त्यांनी सर्व खेळाडूंबाबत कठोर भूमिका घेतली. बीसीसीआयला सांगून 10 नवीन नियम आणले.

आठ वर्षांपूर्वी असच घडलेलं

हीच कठोरता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पराभवाच कारण बनू शकते. त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं जाऊ शकतं. हे असं आठ वर्षापूर्वी सुद्धा घडलय. 2017 साली अनिल कुंबळे यांना चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्यांच्या कठोर स्वभावामुळे राजीनामा द्यावा लागला होता. विराट कोहलीसमोर त्यांना झुकावं लागलेलं.

किती पराभव झाले?

गौतम गंभीर यांनी मागच्यावर्षी 2024 ऑगस्टमध्ये हेड कोच पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर टीमच्या कामगिरीत सातत्याने घसरण झाली आहे. गंभीर हेड कोच असतानाच 27 वर्षानंतर श्रीलंकेत वनेड सीरीजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत पराभव झाला. ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-3 ने पराभव झाला. टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या बाहेर गेली. त्यांच्यावर खूप दबाव आहे. टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पराभव झाल्यास गौतम गंभीरच्या अडचणी वाढू शकतात.

कुंबळे आणि कोहलीचा वाद

भारतीय टीमचे दिग्गज स्पिनर अनिल कुंबळे यांनी जून 2016 मध्ये हेड कोचची जबाबदारी संभाळली. त्यांच्या नियुक्तीला क्रिकेट एडवायजरी कमिटीचे सदस्य सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि वीवीएस लक्ष्मण यांनी हिरवा कंदिल दाखवला. पण त्यावेळी कुंबळे आणि कोहलीमध्ये एकमत होऊ शकलं नाही.

पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार.